शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राजकीय अनास्थेचा मराठवाड्याला फटका, अवघ्या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : राजकीय अनास्थेचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील रेल्वे विकासाला बसत आहे. वर्षानुवर्षे रेल्वे प्रकल्प कागदावरच आहे. दक्षिण ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : राजकीय अनास्थेचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील रेल्वे विकासाला बसत आहे. वर्षानुवर्षे रेल्वे प्रकल्प कागदावरच आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात तब्बल ८९३ कि. मी.चा रेल्वे मार्ग आहे; परंतु यात केवळ ८१.८५० कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे, तर फक्त ३७ कि.मी. विद्युतीकरण झाले आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती पुढे आली असून, मराठवाड्यातील खासदारांनी आतातरी जागे व्हावे, अशी अपेक्षा रेल्वे संघटनांकडून व्यक्त होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु वर्षानुवर्षे हा प्रस्ताव कागदावरच आहे. दुहेरीकरणाचा हा प्रस्तावही थंडबस्त्यात गेला आहे. या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले असताना सध्या तरी त्याला रेल्वे बोर्डाकडून प्राधान्य नसल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले आहे. मनमाड-परभणी हा २९१ कि.मी.चा मार्ग आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही प्रस्तावाला मंजुरीच मिळालेली नाही. त्यामुळे हा खर्चही वाढल्याची शक्यता आहे. एकेरी रुळावरून क्षमतेपेक्षा अधिक रेल्वे धावतात. त्याची रेल्वे प्रशासनाला कल्पना आहे. एकेरी मार्गावर इंजिन नादुरुस्त झाले तर संपूर्ण वाहतूकच विस्कळीत होते, तरीही दुहेरीकरणाचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे. राजकीय पाठपुरावा कमी पडत असल्याची ही परिस्थिती ओढावत असल्याची ओरड होत आहे.

------

खासदारांनी जागे व्हावे

माहिती अधिकारात दुहेरीकरण, विद्युतीकरणाची माहिती मागितली होती. तेव्हा नांदेड विभागात ८९३ कि.मी. पैकी केवळ ८१ कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण आणि ३७ कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण झाल्याची माहिती मिळाली. दक्षिण मध्य रेल्वेच्या अन्य विभागांत पूर्ण विद्युतीकरण, दुहेरीकरण झाले आहे. मराठवाड्यावरच अन्याय होत आहे. मराठवाड्यातील खासदारांनी आता तरी जागे झाले पाहिजे.

- गौतम नाहाटा, अध्यक्ष, नमो रेल्वे संघटना

-----

पुढील अर्थसंकल्पात दुहेरीकरण

मनमाड-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुढील म्हणजे २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात घेतले जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. विद्युतीकरणाला मंजुरी मिळाली आहे. निविदाही पूर्ण झाली आहे. रेल्वेमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरच विद्युतीकरणाचे भूमिपूजन केले जाईल.

- खा. डाॅ. भागवत कराड