शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

पीडितेचा पोलिसांकडूनच छळ!

By admin | Updated: April 1, 2015 01:04 IST

औरंगाबाद : बलात्काराची तक्रार देण्यासाठी एका पीडित महिलेने छावणी ठाण्यात आठ दिवस खेट्या मारल्या... तक्रार देण्यासाठी ठाण्यासमोर एक रात्र जागून काढली तरी दया आली नाही.

औरंगाबाद : बलात्काराची तक्रार देण्यासाठी एका पीडित महिलेने छावणी ठाण्यात आठ दिवस खेट्या मारल्या... तक्रार देण्यासाठी ठाण्यासमोर एक रात्र जागून काढली तरी दया आली नाही. पोलीस आयुक्तांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर कोठे हालचाल झाली. महिला अत्याचाराबाबत छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी किती जागरुक आहे, याची प्रचीती या घटनेने पुन्हा एकदा आली. भावसिंगपुऱ्यातील प्रभातनगर परिसरात राहणाऱ्या तरुणाची ओळख एका तरुणीसोबत झाली होती. हा तरुण वाहनचालक म्हणून काम करतो. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी गुपचूप नक्षत्रवाडीत भाड्याची खोली घेऊन संसार थाटला. या काळात त्या महिलेला एक मुलगी झाली. त्यानंतर अचानक या तरुणाने संबंध तोडले. तो तिला टाळू लागला. शेवटी या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला अन् छावणी पोलीस ठाणे गाठले. आता ‘सेटलमेंट’चा मार्ग आता मात्र परत हे प्रकरण आयुक्तांपर्यंत गेले तर अडचण होईल, हे लक्षात आल्यानंतर छावणी पोलिसांनी त्या तरुणाच्या आई, वडील व भावांना ठाण्यात आणले. मुलगा परराज्यात गेलेला आहे, तो आल्यानंतर आम्ही दोघांचे लग्न लावून देतो, अशी घरच्यांनी छावणी पोलिसांना हमी दिली आहे. तेव्हा पोलिसांनी ‘तक्रार करून कशाला आयुष्याचे वाटोळे करून घेते, त्याला येईपर्यंत वाट पाहा’ असा सल्ला दिला. त्यामुळे मंगळवारीही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. आठ दिवसांपूर्वीच छावणी पोलिसांनी या तरुणीचे म्हणणे ऐकून घेतले असते आणि आयुक्तांच्या आदेशानंतर केलेले प्रयत्न तेव्हाच केले असते तर या पीडितेचा छळ झाला नसता. या घटनेवरून छावणी पोलीस महिला अत्याचाराच्या घटनांबाबत किती गंभीर आहेत, हे स्पष्ट दिसून येते.