शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत चो-या, घरफोड्या रोखण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:43 IST

पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले. जीपीएस मोबाईल गस्त आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी ठेवलेला वचक हे यामागचे गमक असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नमूद केले.दरवर्षी दसरा, दिवाळी उत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात चो-या, घरफोड्या होतात. यामुळे दिवाळीच्या सुटीत सहलीवर आणि गावी जाणा-या नागरिकांना घराच्या सुरक्षेबाबत सतत चिंता असते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी दीपोत्सवाच्या महिनाभर आधीच नियोजनबद्ध काम हाती घेतले. हे काम होते रेकॉर्डवरील चो-या, घरफोड्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याचे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहरात आल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्धता आणि तडीपारीसारख्या कारवाईचे आदेश दिले. हे आदेश प्राप्त होताच उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांनी त्यांच्या परिमंडळातील गुन्हेगारांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत प्रत्येक ठाण्यांतर्गत टॉप २० गुन्हेगारांचे मोबाईल नंबर घेऊन त्याना जीपीएसशी जोडण्यात आले होते. परिणामी कोणत्या वेळी कोणता गुन्हेगार कोठे होता आणि आहे याबाबतची सर्व माहिती पोलिसांना सहज उपलब्ध होते. यासोबतच जे चोरटे सक्रिय आहेत त्यांना कारागृहात बंद करण्यात आले. पोलिसांकडून कडक कारवाई सुरू झाल्यापासून अनेकांनी शहरातून मुक्काम हलविणेच पसंत केले. पोलिसांची गस्त नियमित आणि योग्य झाली अथवा नाही, याबाबतचा अहवाल रोजच्या रोज पोलीस आयुक्तांच्या टेबलवर जातो. या अहवालाच्या आधारे पोलिसांची एक जरी व्हॅन एकाच ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतचे उत्तर तात्काळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना विचारले जाते. यामुळे एखाद्या ठाण्याची गाडी नादुरुस्त झाली असल्यास मोटार वाहन कार्यशाळेतून तात्काळ दुसरी गाडी उपलब्ध केली जाते. यामुळे गस्त कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही. जीपीएस आधारित पोलिसांच्या गस्तदरम्यान कोणताही व्यक्ती संशयास्पद दिसल्यास त्याची विचारपूस होते. शिवाय चो-या, घरफोड्या टाळण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना करावी, याबाबतचे जागरण करणारे पत्रक पोलिसांकडून शहरात वाटण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. परिणामी चो-या रोखण्यात आम्ही यशस्वी झालो.