शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

दिवाळीत चो-या, घरफोड्या रोखण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:43 IST

पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले. जीपीएस मोबाईल गस्त आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी ठेवलेला वचक हे यामागचे गमक असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नमूद केले.दरवर्षी दसरा, दिवाळी उत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात चो-या, घरफोड्या होतात. यामुळे दिवाळीच्या सुटीत सहलीवर आणि गावी जाणा-या नागरिकांना घराच्या सुरक्षेबाबत सतत चिंता असते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी दीपोत्सवाच्या महिनाभर आधीच नियोजनबद्ध काम हाती घेतले. हे काम होते रेकॉर्डवरील चो-या, घरफोड्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याचे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहरात आल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्धता आणि तडीपारीसारख्या कारवाईचे आदेश दिले. हे आदेश प्राप्त होताच उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांनी त्यांच्या परिमंडळातील गुन्हेगारांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत प्रत्येक ठाण्यांतर्गत टॉप २० गुन्हेगारांचे मोबाईल नंबर घेऊन त्याना जीपीएसशी जोडण्यात आले होते. परिणामी कोणत्या वेळी कोणता गुन्हेगार कोठे होता आणि आहे याबाबतची सर्व माहिती पोलिसांना सहज उपलब्ध होते. यासोबतच जे चोरटे सक्रिय आहेत त्यांना कारागृहात बंद करण्यात आले. पोलिसांकडून कडक कारवाई सुरू झाल्यापासून अनेकांनी शहरातून मुक्काम हलविणेच पसंत केले. पोलिसांची गस्त नियमित आणि योग्य झाली अथवा नाही, याबाबतचा अहवाल रोजच्या रोज पोलीस आयुक्तांच्या टेबलवर जातो. या अहवालाच्या आधारे पोलिसांची एक जरी व्हॅन एकाच ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतचे उत्तर तात्काळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना विचारले जाते. यामुळे एखाद्या ठाण्याची गाडी नादुरुस्त झाली असल्यास मोटार वाहन कार्यशाळेतून तात्काळ दुसरी गाडी उपलब्ध केली जाते. यामुळे गस्त कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही. जीपीएस आधारित पोलिसांच्या गस्तदरम्यान कोणताही व्यक्ती संशयास्पद दिसल्यास त्याची विचारपूस होते. शिवाय चो-या, घरफोड्या टाळण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना करावी, याबाबतचे जागरण करणारे पत्रक पोलिसांकडून शहरात वाटण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. परिणामी चो-या रोखण्यात आम्ही यशस्वी झालो.