शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

दिवाळीत चो-या, घरफोड्या रोखण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:43 IST

पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले. जीपीएस मोबाईल गस्त आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी ठेवलेला वचक हे यामागचे गमक असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नमूद केले.दरवर्षी दसरा, दिवाळी उत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात चो-या, घरफोड्या होतात. यामुळे दिवाळीच्या सुटीत सहलीवर आणि गावी जाणा-या नागरिकांना घराच्या सुरक्षेबाबत सतत चिंता असते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी दीपोत्सवाच्या महिनाभर आधीच नियोजनबद्ध काम हाती घेतले. हे काम होते रेकॉर्डवरील चो-या, घरफोड्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याचे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहरात आल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्धता आणि तडीपारीसारख्या कारवाईचे आदेश दिले. हे आदेश प्राप्त होताच उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांनी त्यांच्या परिमंडळातील गुन्हेगारांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत प्रत्येक ठाण्यांतर्गत टॉप २० गुन्हेगारांचे मोबाईल नंबर घेऊन त्याना जीपीएसशी जोडण्यात आले होते. परिणामी कोणत्या वेळी कोणता गुन्हेगार कोठे होता आणि आहे याबाबतची सर्व माहिती पोलिसांना सहज उपलब्ध होते. यासोबतच जे चोरटे सक्रिय आहेत त्यांना कारागृहात बंद करण्यात आले. पोलिसांकडून कडक कारवाई सुरू झाल्यापासून अनेकांनी शहरातून मुक्काम हलविणेच पसंत केले. पोलिसांची गस्त नियमित आणि योग्य झाली अथवा नाही, याबाबतचा अहवाल रोजच्या रोज पोलीस आयुक्तांच्या टेबलवर जातो. या अहवालाच्या आधारे पोलिसांची एक जरी व्हॅन एकाच ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतचे उत्तर तात्काळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना विचारले जाते. यामुळे एखाद्या ठाण्याची गाडी नादुरुस्त झाली असल्यास मोटार वाहन कार्यशाळेतून तात्काळ दुसरी गाडी उपलब्ध केली जाते. यामुळे गस्त कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही. जीपीएस आधारित पोलिसांच्या गस्तदरम्यान कोणताही व्यक्ती संशयास्पद दिसल्यास त्याची विचारपूस होते. शिवाय चो-या, घरफोड्या टाळण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना करावी, याबाबतचे जागरण करणारे पत्रक पोलिसांकडून शहरात वाटण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. परिणामी चो-या रोखण्यात आम्ही यशस्वी झालो.