शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पीडित महिलांना पोलिसांचे संरक्षण

By admin | Updated: July 11, 2016 01:13 IST

औरंगाबाद : पीडित महिलांना धमकावण्याचे अथवा आमिष दाखवून फिर्याद मागे घेण्यासाठी अथवा साक्ष बदलण्यासाठी दबाव येण्याची शक्यता असते.

औरंगाबाद : बलात्कार, विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून पीडित महिलांना धमकावण्याचे अथवा आमिष दाखवून फिर्याद मागे घेण्यासाठी अथवा साक्ष बदलण्यासाठी दबाव येण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पीडितांची महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी हे वारंवार भेट घेऊन आरोपींकडून काही त्रास असल्यास बिनधास्तपणे सांगा, त्यांना घाबरू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची, अशी ग्वाही देत आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गतवर्षी पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या १५ पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंगाचे एकूण ३८३ गुन्हे दाखल झाले होते, तर बलात्काराच्या ६५ घटना घडल्या होत्या. यातील अटक झालेल्या काही आरोपींना न्यायालयाने जामिनावर सोडलेले असते, अशा गुन्हेगारांकडून तक्रारदार महिलांना केस मागे घेण्यासाठी अथवा त्यांच्याविरोधात साक्ष देऊ नये, यासाठी धमकावण्याचे अथवा आमिष दाखवण्याचे प्रकार होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकरणातील सर्व तक्रारदार महिलांची भेट घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी महिला अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्व तक्रारदार महिलांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. यातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन प्रकरणांतील आरोपींनी पीडितांना धमकावल्याचे उघड झाले. त्यामुळे त्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली. तसेच अन्य महिला अत्याचारांच्या गुन्ह्यातील प्रकरणातील पीडितांनाही सुरक्षेची हमी देण्यात आली आहे. १३४ निर्जन स्थळांवर वाढवली गस्त गतवर्षी सुंदरवाडी शिवारात आणि गोलवाडी परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने प्रेमीयुगुलांचे अड्डे असलेली १३४ निर्जन स्थळे शोधून काढली आहेत. या स्थळी जोडप्यांना थांबू दिले जात नाही. शिवाय चार्ली पोलीस, पीसीआर मोबाईलवरील कर्मचाऱ्यांना नियमितपणे त्या स्थळाकडे जाण्याचे आदेशित केलेलेआहे.