शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था

By admin | Updated: June 22, 2014 00:41 IST

हदगाव : येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे थोडा पाऊस पडला की, अनेक घरांना गळती लागणार असल्याने कुटुंबाने राहावे कुठे असा प्रश्न जनतेची सुरक्षा

हदगाव : येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे थोडा पाऊस पडला की, अनेक घरांना गळती लागणार असल्याने कुटुंबाने राहावे कुठे असा प्रश्न जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कुटुंबियासमोर उपस्थित झाला आहे. हदगाव ठाण्याची इमारत सुसज्ज झाली परंतु जीव मुठीत घेऊन जनतेसाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना मात्र पडक्या इमारतीत रहावे लागत आहे. यामुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. सन १९८४-८५ मध्ये या वसाहतीचे बांधकाम झाले. त्यानंतर सोयीनुसार ४-५ वर्षाला निवासस्थानांची डागडुजी करण्यात आली. ही घरे १० बाय १० किचन व बाथरुम अशा स्वरूपाची आहेत. पती-पत्नी व २ मुलं असा छोटा परिवार यामध्ये राहू शकतो. परंतु पाहुणा आल्यास त्याची मात्र मोठी गैरसोय होते. अशी परिस्थिती असताना देखील ही मंडळी खुश परंतु घर कोरडं असाव एवढी अपेक्षा. कर्मचारी असूनही जागा अपुरी असल्यामुळे अनेकांनी स्वखर्चाने मजुरांच्या घरासारखे समोर टिन लाऊन संसार धकवला. या ठिकाणी असलेले दोन हातपंप व बोअरवेलही बंद अवस्थेत आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे सार्वजनिक नळाचे पाणी भरावे लागते. पाण्यासाठी कुटूंबियांनी वणवण फिरावे लागते. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे कुटूंब असुरक्षित आहेत. यामुळे या परिसरात मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या वेतनातून घरासाठी १२०० ते १५०० रुपये मसिक भाडे कपात केले जाते. परंतु त्या तुलनेत कोणत्याही सुविधा नाहीत. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना महिलांना असुरक्षितता वाटते. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामावरही ताण पडतो. रात्री कर्तव्य बजावताना वारंवार घरी फोन करुन काळजी घ्यावी लागते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलिसांसाठी नवीन पोलिस वसाहती बांधून देण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातून होत आहे. (वार्ताहर)६४ पैकी १४ च घरे वापरात एकूण ४६ घराची संख्या आहे. त्यापैकी १४ घरे वापरात असून उर्वरित पडकी झाली आहेत. व्यवस्थापन नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. चारही बाजुकडून अतिक्रमणे झाली आहेत. संरक्षण भिंत नाही. रस्त्याची स्थिती दयनीय असून साहित्य अर्धवट अवस्थेत पडले आहे. सहा वर्षापासून वाचनालय व मनोरंजन केंद्र कॉलनीतले बंद आहे. त्याच्यावरील पत्रे उडून गेली आहेत.