शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था

By admin | Updated: June 22, 2014 00:41 IST

हदगाव : येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे थोडा पाऊस पडला की, अनेक घरांना गळती लागणार असल्याने कुटुंबाने राहावे कुठे असा प्रश्न जनतेची सुरक्षा

हदगाव : येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे थोडा पाऊस पडला की, अनेक घरांना गळती लागणार असल्याने कुटुंबाने राहावे कुठे असा प्रश्न जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कुटुंबियासमोर उपस्थित झाला आहे. हदगाव ठाण्याची इमारत सुसज्ज झाली परंतु जीव मुठीत घेऊन जनतेसाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना मात्र पडक्या इमारतीत रहावे लागत आहे. यामुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. सन १९८४-८५ मध्ये या वसाहतीचे बांधकाम झाले. त्यानंतर सोयीनुसार ४-५ वर्षाला निवासस्थानांची डागडुजी करण्यात आली. ही घरे १० बाय १० किचन व बाथरुम अशा स्वरूपाची आहेत. पती-पत्नी व २ मुलं असा छोटा परिवार यामध्ये राहू शकतो. परंतु पाहुणा आल्यास त्याची मात्र मोठी गैरसोय होते. अशी परिस्थिती असताना देखील ही मंडळी खुश परंतु घर कोरडं असाव एवढी अपेक्षा. कर्मचारी असूनही जागा अपुरी असल्यामुळे अनेकांनी स्वखर्चाने मजुरांच्या घरासारखे समोर टिन लाऊन संसार धकवला. या ठिकाणी असलेले दोन हातपंप व बोअरवेलही बंद अवस्थेत आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे सार्वजनिक नळाचे पाणी भरावे लागते. पाण्यासाठी कुटूंबियांनी वणवण फिरावे लागते. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे कुटूंब असुरक्षित आहेत. यामुळे या परिसरात मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या वेतनातून घरासाठी १२०० ते १५०० रुपये मसिक भाडे कपात केले जाते. परंतु त्या तुलनेत कोणत्याही सुविधा नाहीत. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना महिलांना असुरक्षितता वाटते. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामावरही ताण पडतो. रात्री कर्तव्य बजावताना वारंवार घरी फोन करुन काळजी घ्यावी लागते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलिसांसाठी नवीन पोलिस वसाहती बांधून देण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातून होत आहे. (वार्ताहर)६४ पैकी १४ च घरे वापरात एकूण ४६ घराची संख्या आहे. त्यापैकी १४ घरे वापरात असून उर्वरित पडकी झाली आहेत. व्यवस्थापन नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. चारही बाजुकडून अतिक्रमणे झाली आहेत. संरक्षण भिंत नाही. रस्त्याची स्थिती दयनीय असून साहित्य अर्धवट अवस्थेत पडले आहे. सहा वर्षापासून वाचनालय व मनोरंजन केंद्र कॉलनीतले बंद आहे. त्याच्यावरील पत्रे उडून गेली आहेत.