शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात घरघर!

By admin | Updated: August 18, 2016 00:53 IST

जालना : वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने बाब समोर आली आहे

जालना : वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने बाब समोर आली आहे. गत पाच महिन्यांत केवळ सातच तक्रारी नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी तत्त्कालीन पोलिस महासंचालक प्रविणकुमार दीक्षित यांच्या संकल्पनेतून पोलिस मित्र अ‍ॅप राज्यभर लाँच करण्यात आला. ज्या ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. तेथे हा अ‍ॅप सुरु करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने डिजीटल इंडियांतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अ‍ॅप लाँच केला होता. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. अ‍ॅपद्वारे नोंदविलेल्या तक्रारींसाठी संगणकाचे ज्ञान असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ज्यांना मदतीची तात्काळ गरज आहे अशांसाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. गत पाच महिन्यांत केवळ सातच तक्रारी पोलिस नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचेही निरसन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिस प्रशासनाने या अ‍ॅपबाबत जनजागृती केल्यास नागरिकांना या अ‍ॅपचे महत्व पटून नागरिक अ‍ॅपच्या वापराकडे वळतील असेही मोबाईलधारकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. परिणामी सध्या या कक्षातील कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. सध्या या अ‍ॅपवर तक्रारी येतच नसल्याचे सांगण्यात येत असल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)