शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोलिसांनी घेतली गुन्हेगारांची ‘परेड’

By admin | Updated: June 7, 2016 23:49 IST

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले.

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले. त्याअंतर्गत ‘रेकॉर्ड’वरील तब्बल अडीचशे गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. त्यांची मग आयुक्तालयात मंगळवारी दुपारी चांगलीच ‘हजेरी’ घेण्यात आली. नीट राहा, सुधरा, गुन्हे करताल तर याद राखा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांना भरला. गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरूआहे. एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत आहेत. या शिवाय वाहन चोरांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरातून दोन, तीन वाहने चोरी जात आहेत. घरफोड्यांचे सत्रही थांबण्यास तयार नाही. हे गुन्हे करणारे कोण आहेत, हे निश्चित पोलिसांना समजेनासे झाले आहे. रात्रभर गुन्हेगारांची धरपकडनिश्चित गुन्हेगार काही सापडत नसल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांची ‘हजेरी’ घेण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना, गुन्हेशाखेला रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडून आणण्याचे आदेश जारी करण्यात आले. सोमवारी रात्री या ‘आॅपरेशन आॅल आऊट’सुरुवात झाली. प्रत्येक पोलीस ठाण्याला २० गुन्हेगार पकडून आणण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार रात्रभर आपापल्या हद्दीत जंगजंग पछाडत पोलिसांनी एकूण २५० गुन्हेगारांची धरपकड केली. काय फरक पडणार?आठ महिन्यांपूर्वीही पोलीस आयुक्तांनी अशाच पद्धतीने रेकॉर्डवरील सर्वच गुन्हेगारांना पकडून आयुक्तालयात आणून त्यांची चांगलीच ‘हजेरी’ घेतली होती. मात्र, त्यानंतर गुन्हेगारी काही कमी झाली नव्हती. आता पुन्हा मंगळवारी तोच पाढा गिरविण्यात आला. मंगळवारच्या ‘दमबाजी’ने गुन्हेगारांमध्ये किती फरक पडतो, हे लवकर दिसून येईल. आयुक्तालयात भरली ‘शाळा’‘आॅपरेशन आॅल आऊट’मध्ये पकडलेल्या सर्व गुन्हेगारांना सकाळी पोलीस आयुक्तालयातील अलंकार सभागृहात आणून बसविण्यात आले. मग दुपारी या सर्वांना एका ठिकाणी बसवून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी त्यांची ‘परेड’ घेतली. एका एका गुन्हेगाराला उभा करून आयुक्तांनी त्याची कुंडली जाणून घेतली आणि मग सर्वांना नीट राहा, यापुढे गुन्हे कराल तर गाठ आमच्याशी आहे. गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील’ अशा शब्दात आयुक्तांनी या गुन्हेगारांना दम भरला.