शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पोलिसांनी घेतली गुन्हेगारांची ‘परेड’

By admin | Updated: June 7, 2016 23:49 IST

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले.

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले. त्याअंतर्गत ‘रेकॉर्ड’वरील तब्बल अडीचशे गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. त्यांची मग आयुक्तालयात मंगळवारी दुपारी चांगलीच ‘हजेरी’ घेण्यात आली. नीट राहा, सुधरा, गुन्हे करताल तर याद राखा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांना भरला. गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरूआहे. एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत आहेत. या शिवाय वाहन चोरांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरातून दोन, तीन वाहने चोरी जात आहेत. घरफोड्यांचे सत्रही थांबण्यास तयार नाही. हे गुन्हे करणारे कोण आहेत, हे निश्चित पोलिसांना समजेनासे झाले आहे. रात्रभर गुन्हेगारांची धरपकडनिश्चित गुन्हेगार काही सापडत नसल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांची ‘हजेरी’ घेण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना, गुन्हेशाखेला रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडून आणण्याचे आदेश जारी करण्यात आले. सोमवारी रात्री या ‘आॅपरेशन आॅल आऊट’सुरुवात झाली. प्रत्येक पोलीस ठाण्याला २० गुन्हेगार पकडून आणण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार रात्रभर आपापल्या हद्दीत जंगजंग पछाडत पोलिसांनी एकूण २५० गुन्हेगारांची धरपकड केली. काय फरक पडणार?आठ महिन्यांपूर्वीही पोलीस आयुक्तांनी अशाच पद्धतीने रेकॉर्डवरील सर्वच गुन्हेगारांना पकडून आयुक्तालयात आणून त्यांची चांगलीच ‘हजेरी’ घेतली होती. मात्र, त्यानंतर गुन्हेगारी काही कमी झाली नव्हती. आता पुन्हा मंगळवारी तोच पाढा गिरविण्यात आला. मंगळवारच्या ‘दमबाजी’ने गुन्हेगारांमध्ये किती फरक पडतो, हे लवकर दिसून येईल. आयुक्तालयात भरली ‘शाळा’‘आॅपरेशन आॅल आऊट’मध्ये पकडलेल्या सर्व गुन्हेगारांना सकाळी पोलीस आयुक्तालयातील अलंकार सभागृहात आणून बसविण्यात आले. मग दुपारी या सर्वांना एका ठिकाणी बसवून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी त्यांची ‘परेड’ घेतली. एका एका गुन्हेगाराला उभा करून आयुक्तांनी त्याची कुंडली जाणून घेतली आणि मग सर्वांना नीट राहा, यापुढे गुन्हे कराल तर गाठ आमच्याशी आहे. गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील’ अशा शब्दात आयुक्तांनी या गुन्हेगारांना दम भरला.