शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पोलिसांच्या कारवाईची ‘कोंडी’

By admin | Updated: May 25, 2016 00:30 IST

औरंगाबाद : बऱ्याच वर्षांनंतर अखेर मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवीत का होईना रोशनगेट रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘साफसफाई’ मोहीम राबविली.

औरंगाबाद : बऱ्याच वर्षांनंतर अखेर मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवीत का होईना रोशनगेट रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘साफसफाई’ मोहीम राबविली. अनेक वर्षांपासून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई करीत असतानाच एमआयएमच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी मात्र, राडेबाजी करीत, धुडगूस घालीत पोलिसांच्या या मोहिमेचीच ‘कोंडी’ करण्याचा प्रयत्न केला. अखेर धुडगूस घालणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. त्यामुळे रोशनगेट भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. रोशनगेट, किराडपुरा, मौलाना आझाद चौक, चेलीपुरा रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यात अनेक वर्षांपासून भंगार, जुनी वाहने उभी करून ठेवलेली आहे. शिवाय आसपासचे दुकानदारही रस्त्यावरच वाहने उभी करतात. फेरीवालेही हा रस्ता व्यापून घेतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे.सध्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीमच वाहतूक शाखा पोलिसांनी हाती घेतलेली आहे. सतत कोणत्या ना कोणत्या भागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी शहर वाहतूक शाखेने सकाळच्या वेळी अखेर रोशनगेट परिसराकडे मोर्चा वळविला. या रस्यावर गेल्या अनेक वर्षांमध्ये पोलिसांनी कारवाई केलेली नव्हती. वाहतूक शाखेचे निरीक्षक मुदिराज, सहायक निरीक्षक (पान २ वर)मोहीम सुरूच राहणाररोशनगेट, चंपाचौक, चेलीपुरा, मौलाना आझाद चौक, कटकटगेट, शहागंज आणि परिसरात वाहतुकीचा सतत खोळंबा होत असतो. ही कोंडी फोडण्यासाठी यापुढेही सतत अशी मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. या चांगल्या कामाला सर्वांचे सहकार्य मिळेल. जर ही मोहीम राबविताना पोलिसांकडून मारहाण, तोडफोड झाली असेल तर त्याची चौकशी करू.- अमितेशकुमार (पोलीस आयुक्त)जमावातील या गर्दीतून कुणी तरी पोलीस विनाकारण आम्हाला त्रास देत आहेत, दादागिरी करीत आहेत, असे म्हणत मारो इनको, अशी चिथावणी दिली. त्यामुळे जमाव बिथरला. आक्रमक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. या गोंधळामुळे धावपळ उडाली. परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. नंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने जमाव पांगला.रस्ता झाला ‘साफ’४जिन्सी चौक ते रोशनगेट रस्त्यावर अनेक वर्षांपासून अनेक भंगार वाहने पडलेली होती. त्यातील तीन वाहने पोलिसांनी या कारवाईत जप्त केली. अन्य अनेक वाहने नागरिकांनी तेथून काढून घेतली, तर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, इतर वाहने, अशी सुमारे अडीचशे वाहने येथून हटविण्यात आली. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांनंतर ‘साफ’ झाला. पोलिसांवरच आरोपया धावपळीत एक मुलगा जखमी झाला. त्यानंतर जमाव अधिक चिडला. पोलिसांनी या मुलाला मारहाण केली. शिवाय वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रोशनगेटवर येताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या थेट काचा फोडल्या. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना मारहाण केली, पोलीस दादागिरी करीत आहेत, असा आरोप करीत एमआयएमच्या नगरसेवकांनी जमाव घेऊन थेट जिन्सी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात या जमावाने चांगलाच गोंधळ घातला. सहायक निरीक्षक शेख अकमल यांच्याविरुद्ध कारवाई करा, गुन्हा नोंदवा, अशी मागणी या जमावाने केली.