शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

कवींनी मनाची दारे उघडी ठेवावी

By admin | Updated: August 24, 2014 23:34 IST

नांदेड : कविता समजून घेण्यासाठी सुक्ष्म संवेदनशिलता लागते असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले़

नांदेड : नांदेडमध्ये असणारी रसिकता आणि साहित्य मुंबईत पहायला मिळत नाही़ कविता समजून घेण्यासाठी सुक्ष्म संवेदनशिलता लागते ती नांदेडच्या रसिक, कवींमध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले़ महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक श्रद्धा बेलसरे खारकर यांच्या ‘फाईल आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील तर ज्येष्ठ समीक्षक डॉ़ सुहास जेवळीकर, निर्मल प्रकाशनचे संचालक निर्मलकुमार सूर्यवंशी, श्रद्धा बेलसरे यांची मंचावर उपस्थिती होती़ प्रारंभी कवितासंग्रहाचे प्रकाशन डहाके यांच्या हस्ते करण्यात आले़ डहाके म्हणाले, कविंनी नेहमी मनाची दारं उघडी ठेवली पाहिजे़ शासकीय कामात आयुष्य घालवणाऱ्या श्रद्धा बेलसरे यांनी मनाची दारं उघडी ठेवून कार्य करीत राहिल्यामुळेच त्या कवयित्री होवू शकल्या़ मानवी भावबंद आणि संवेदनशिलता यामुळेच त्यांच्या कविता प्रेमवृत्ती व्यक्त करणाऱ्या आहेत़ आयुष्यात कधी प्रेम-प्रेमभाव कमी होत नसतो तर ते व्यक्त करणाच्या पद्धती बदलत असतात असे सांगत डहाके म्हणाले प्रेम हा एक मानवी अनुभव आहे़ ताटातुट, मानवी दुरावा आदी गोष्टी विघातक असून त्या कविला नको आहेत, हे श्रद्धा बेलसरे यांच्या कवितांतून स्पष्ट जाणवते़ ज्येष्ठ समीक्षक डॉ़ सुहास जेवळीकर म्हणाले, आज माहिती आणि ज्ञानाची गल्लत होत आहे़ माहिती आणि अनुभवाच्या सांगडीतून ज्ञानाचे लोणी तयार होते, हे लक्षात घेतले पाहिजे़ सृजलनशिलता, कल्पकतेकडे आपण लक्ष देत नाही़ माणूस आणि निसर्गाला आपण वेगळे संबोधत आहोत त्यामुळे माणसामध्ये अहंकार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ बेलसरे यांच्या कविता सामाजिक भान असलेल्या आणि आत्मभान ठेवून लिहिलेल्या आहेत़ त्यामध्ये कुठेही आक्रमकता दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले़ समारोपात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील म्हणाल्या, आठवीत असतांना केलेल्या कवितांची वही रद्दीमध्ये हरवली़ माझी कविता माझ्या घरच्यांनीच संपवल्या, अशा शब्दात खंत व्यक्त करीत ४२ वर्षापासून कवितेचे आणि आपले नाते तुटले़ परंतु, साहित्यिक, लेखक आणि कवी यांच्यापासून माझी कधीच सुटका झाली नाही़ त्यांचा सहवास मला नेहमीच लाभत राहिला, त्यामुळे मला त्यांच्याशी असलेले भावबंद कधीच संपवता आले नाही, असेही त्यांनी सांगितले़ श्रद्धा बेलसरे, आशा पैठणे आणि त्यांच्या मैत्रीविषयी बोलतांना त्यांनी उपस्थितांना भाऊक केलं़ प्रास्ताविक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले़ आशा पैठणे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)