शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: March 24, 2017 23:48 IST

बीड तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.

राजेश खराडे बीडअद्यापपर्यंत बारदाणाशिवाय जागेअभावी तुरीची अनेक वेळा रखडली होती. अनंत अडचणींवर मात करून तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. काट्यावर वजन होत असतानाच हमाल-मापाड्यांकडून शेतकऱ्यांची तूर काढून घेतली जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंगमधून समोर आले आहे.कृउबाच्या प्रवेशद्वारातून खरेदी केंद्रावरील वजन काट्यावर तूर जाण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. वाढत्या उन्हामुळे वजनात घट ही नैसर्गिक असली तरी काट्यावर मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा मालच काढून घेतला जात आहे. वजनापूर्वी तुरीची चाळणी केली जाते. चाळण्यातून पडणारी तूर मापात न धरता थेट हमाल स्वत:च्या पदरात पाडून घेत आहेत. तुरीचे वजन होत असताना शेतकऱ्यांपेक्षा हमाल-मापाड्यांचीच लगबग अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. एका कट्ट्यामागे जवळपास दीड ते दोन किलो तूर काढली जात आहे. शिवाय बारदाण्याच्या वजनापोटी १ किलो अधिकची तूर घेतली जात आहे. त्यामुळे ५० किलोमागे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तब्बल ३ किलोचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुरू केलेली ही केंद्रे त्यांच्यासाठी मारक ठरत आहेत.