शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘त्या’ कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का

By admin | Updated: June 25, 2014 01:28 IST

औरंगाबाद : एस. टी. बसमधील तब्बल ४५ प्रवाशांचा जीव वाचविताना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जाणारे चालक नवनाथ बोडखे यांना या अपघाताच्या कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का मिळाला.

औरंगाबाद : आपल्या जीवाची पर्वा न करता २४ जून २०११ रोजी एस. टी. बसमधील तब्बल ४५ प्रवाशांचा जीव वाचविताना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जाणारे चालक नवनाथ बोडखे यांना या अपघाताच्या कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का मिळाला. मंगळवारी नवनाथ बोडखे यांना विभाग नियंत्रक संजय सुपेकर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची भेट देण्यात आली.शासनाच्या योजनेनुसार एस. टी. महामंडळातील अपंग कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध झालेल्या वाहनांचे मंगळवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यामध्ये नवनाथ बोडखे यांच्यासह वरिष्ठ लिपिक (लेखापाल), ए. एस. राजहंस, हेमा कांबळे (वैजापूर आगार लिपिक), शिवाजी साखळे या चार कर्मचाऱ्यांना वाहन देण्यात आले. दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी इतरांवर विसंबून राहण्यापेक्षा स्वत:च स्वावलंबी होण्यासाठी देण्यात आलेले वाहन महत्त्वाचे ठरणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी म्हटले. २४ जून २०११ रोजी पुण्याहून औरंगाबादकडे निघालेली एस. टी. महामंडळाची बस अहमदनगरजवळ आली असता समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरचे टायर फुटले आणि दुभाजक तोडून कंटेनर सरळ बसच्या दिशेने आले; परंतु यावेळी नवनाथ बोडखे यांनी समयसूचकता दाखवून बस डाव्या बाजूने वळविल्यामुळे मोठा अपघात टाळला. तीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी आपणास अपंगत्व आले होते, त्याच दिवशी हे वाहन मिळाले. परंतु झालेल्या अपघातात प्रवाशांचे जीव वाचविल्याचे समाधान आयुष्यभर राहणार आहे. अपघात आणि अपंगत्व आल्याच्या त्या कटू आठवणींच्या दिवशीच वाहन मिळाल्याचे सांगताना नवनाथ बोडखे भावुक झाले.