शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘त्या’ कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का

By admin | Updated: June 25, 2014 01:28 IST

औरंगाबाद : एस. टी. बसमधील तब्बल ४५ प्रवाशांचा जीव वाचविताना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जाणारे चालक नवनाथ बोडखे यांना या अपघाताच्या कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का मिळाला.

औरंगाबाद : आपल्या जीवाची पर्वा न करता २४ जून २०११ रोजी एस. टी. बसमधील तब्बल ४५ प्रवाशांचा जीव वाचविताना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जाणारे चालक नवनाथ बोडखे यांना या अपघाताच्या कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का मिळाला. मंगळवारी नवनाथ बोडखे यांना विभाग नियंत्रक संजय सुपेकर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची भेट देण्यात आली.शासनाच्या योजनेनुसार एस. टी. महामंडळातील अपंग कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध झालेल्या वाहनांचे मंगळवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यामध्ये नवनाथ बोडखे यांच्यासह वरिष्ठ लिपिक (लेखापाल), ए. एस. राजहंस, हेमा कांबळे (वैजापूर आगार लिपिक), शिवाजी साखळे या चार कर्मचाऱ्यांना वाहन देण्यात आले. दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी इतरांवर विसंबून राहण्यापेक्षा स्वत:च स्वावलंबी होण्यासाठी देण्यात आलेले वाहन महत्त्वाचे ठरणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी म्हटले. २४ जून २०११ रोजी पुण्याहून औरंगाबादकडे निघालेली एस. टी. महामंडळाची बस अहमदनगरजवळ आली असता समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरचे टायर फुटले आणि दुभाजक तोडून कंटेनर सरळ बसच्या दिशेने आले; परंतु यावेळी नवनाथ बोडखे यांनी समयसूचकता दाखवून बस डाव्या बाजूने वळविल्यामुळे मोठा अपघात टाळला. तीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी आपणास अपंगत्व आले होते, त्याच दिवशी हे वाहन मिळाले. परंतु झालेल्या अपघातात प्रवाशांचे जीव वाचविल्याचे समाधान आयुष्यभर राहणार आहे. अपघात आणि अपंगत्व आल्याच्या त्या कटू आठवणींच्या दिवशीच वाहन मिळाल्याचे सांगताना नवनाथ बोडखे भावुक झाले.