शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण नावालाच..

By admin | Updated: July 23, 2014 00:25 IST

विलास चव्हाण, परभणी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात गावामध्ये वृक्षलागवड करण्यात येते़ यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़

विलास चव्हाण, परभणीपर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात गावामध्ये वृक्षलागवड करण्यात येते़ यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़ परंतु, शासकीय अधिकारी कागदोपत्रीच वृक्षलागवड दाखवून लाखोंचा मलिदा लाटत आहेत़ यामुळे पर्यावरणाचे संर्वधन होण्याऐवजी ऱ्हास होत आहे़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ शासन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत़ परंतु, राज्यासह जिल्ह्यत वनाचे क्षेत्र वाढणे अपेक्षित होते़ परंतु, शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे वनाचे क्षेत्र एक टक्काही वाढले नाही़ अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये कागदोपत्रीच खर्च होत आहेत़ त्यातच वृक्षाची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वनाचे क्षेत्र आणखीन कमी होऊ लागल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे़ यामुळे निसर्गाचा असमतोल निर्माण होत असल्याने तापमानात वाढ होत आहे़ तसेच पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे़ परभणी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६ हजार ५११ चौ़किमी एवढे आहे़ यापैकी १०१़७९ चौ़किमी वनक्षेत्र म्हणजे १़६० टक्के एवढे आहे़ वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून दरवर्षी वन विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो़ परंतु, वृक्ष लागवडीसाठी निधी खर्च केल्यानंतरही जिल्ह्यातील वनाचे क्षेत्र मात्र वाढत नसल्याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे़ रस्त्याच्या दुतर्फा झाडे गेली कुठे ?वनविभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील रस्त्याच्या दुतर्फा लाखो झाडे लावली जातात़ परंतु, जिल्ह्यातील रस्त्याच्या दुतर्फा झाडेच दिसत नाहीत़ लावलेली झाडे गेली कुठे ? हा गहन प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे़ लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे किती टक्के जिवंत राहतात हा संशोधनाचा विषय ठरेल़शतकोटी योजना बासनातगतवर्षी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून शतकोटी योजना राबविण्यात आली़ या योजनेतंर्गत शाळा, महाविद्यालय, शेतावरील बाध, प्रशासकीय कार्यालयाचा परिसर, गाव व शहरातील घरासमोर वृक्षलागवड करण्यात आली़ परंतु, प्रत्यक्षात वृक्षलागवड न करता कागदोपत्री करून कोट्यवधीं रुपये अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाटल्याने ही चांगली योजना बासणात बांधण्याची वेळ शासनावर आली आहे़ या योजनेची अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली असती तर नक्कीच जिल्ह्यात झाडांची संख्या वाढली असती़ परंतु, मनपाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.सरार्सपणे वृक्षतोडपरभणी जिल्ह्यात केवळ १़६० टक्के वनाचे क्षेत्र आहे़ वन विभागाने या वनाचे रक्षण करणे गरजे आहे़ परंतु, वृक्षांची जिल्ह्यात सरार्सपणे तोड केली जात असल्यामुळे वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे़ शहरासह ग्रामीण भागातील अवैध लाकुड कटई मशीनकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़