शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा पावसानंतरच कपाशीची लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:11 IST

सेंद्रिय बोंडअळीमुळे मागच्या वर्षी झालेले मोठे नुकसान पाहता यंदा पुरेशा पावसानंतरच कपाशीची लागवड करा, तरच बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळता येईल

औरंगाबाद : सेंद्रिय बोंडअळीमुळे मागच्या वर्षी झालेले मोठे नुकसान पाहता यंदा पुरेशा पावसानंतरच कपाशीची लागवड करा, तरच बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळता येईल, असा सल्ला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, मोहीम अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, यंदा मुबलक पावसाचा अंदाज आहे. बळीराजाने पुरेशा पावसानंतरच कापसाची पेरणी करावी. कृषी विभागाने खरिपाची जय्यत तयारी केलेली आहे. यावर्षी बियाणांची पुरेशी उपलब्धता असल्याने कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.

बागायती कपाशीमध्ये ७० ते ९० टक्क्यांपर्यंत किडींचा प्रादुर्भाव झाला होता. कपाशीची लागवड उशिरा झाल्याने बागायतीच्या तुलनेत कोरडवाहू कपाशीत किडींचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे २०१६-१७ च्या हंगामात आढळून आले आहे. मान्सून सुरू झाल्याबरोबर सुप्तावस्थेतून बाहेर पडलेल्या पतंगास कापूस पिकाची फुलोरा अवस्था न सापडल्यास अंडीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या मरून जातात व या किडीची संख्या हंगामात कमी होण्यास मदत होते. म्हणून या किडीस हुल देण्यासाठी हंगामातील मान्सूनचे आगमन झाल्यानंतर १० ते १५ दिवसांत लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकेल, अशी माहिती उदय चौधरी यांनी दिली. 

बियाणांच्या पाकिटासोबत बोंडअळी व्यवस्थापनासाठी उपाययोजनांचे हॅण्डबिल संबंधित बियाणे कंपनीने विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांस उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या. यावेळी कृषी साहित्य विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सोनी, सर्व बियाणे, खते कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी, कृषी निविष्ठा विक्रेत्यांची उपस्थिती होती.

खरीप हंगाम नियोजन - जिल्ह्यात ७ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित आहे. - कपाशीचे क्षेत्र ७.५ टक्क्यांनी घटणार आहे. - कपाशीऐवजी मका, तूर व इतर कडधान्य पिके, ऊस, कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. - बी. टी. कापूस बियाण्यांचे १८ लाख ८६ हजार पाकिटे उपलब्ध.- मक्याचे ३१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध. - ८२,००० मे.टन खतांचा साठा उपलब्ध.- बागायती कापसाची लागवड जूनच्या मध्यावधीस करावी. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादcottonकापूस