शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांआड प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी देण्याचे नियोजन

By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST

लातूर : लातूर शहर मनपाच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर देखरेख आणि नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या

लातूर : लातूर शहर मनपाच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर देखरेख आणि नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, प्रकाश खपले, डॉ. प्रताप काळे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेऊन शहराची पाहणी केली. दरम्यान, शहरातील प्रत्येक कुटुंबाला आठ दिवसांआड २०० लिटर पाणी देण्याचे नियोजनही त्यांनी शनिवारी केले. महानगरपालिकेत प्रभाग अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी घेतली. शिवाय, टँकर भरणास्थळाला भेटी देऊन पाणी किती संकलित झाले आहे, याची माहिती घेतली. सद्य:स्थितीत लातूर शहरातील जलकुंभामध्ये ३ लाख लिटर्स पाणी उपलब्ध आहे. शिवाय, मोठ्या क्षमतेच्या टँकरद्वारे आणखी पाणी डोंगरगाव, भंडारवाडी निम्न तेरणातून पाणी आणले जात आहे. या पाण्याचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठी या तिन्ही अधिकाऱ्यांनी मनपातील अधिकाऱ्यांसमवेत रविवारी चर्चा केली. दरम्यान, वॉर्ड अधिकाऱ्यांची आणि नगरसेवकांची उद्यापासून बैठका घेऊन प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर्स पाणी आठ दिवसांआड देण्याचा मनोदय उपरोक्त अधिकाऱ्यांचा आहे. शिवाय, या तिघांनीही वॉर्डनिहाय पाणी वितरणाचे नियोजन केले असून, शहरातील ३५ वॉर्ड या तिघांनी विभागून घेतले आहेत. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, खोरी गल्ली, खोपेगाव, सरस्वती कॉलनी या भागांत पाहणी करून बोअर घेतल्यास पाणी लागेल का, याची चाचपणी करण्यात आली असून, येथे बोअर घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शहरातील ३५ वॉर्डांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन केले जात आहे. ३५ वॉर्ड आम्ही तिघांनी विभागून घेतले आहेत. त्यानुसार तेथे नियोजन केले जाईल. रविवारी शहराची पाहणी करून मनपातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे कमलाकर फड यांनी सांगितले.