शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गणवेश वाटपाचे नियोजन बारगळणार

By admin | Updated: June 8, 2017 23:51 IST

हिंगोली :गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाकडून नियोजन बारगळणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळा उघडताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाकडून दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने गणवेश वाटपाचे नियोजन दरवर्षी बारगळते. यावर्षीपासून सदर गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार होती. मात्र अद्याप विद्यार्थ्यांच्या ती जमा झाली नाही. सदर योजनेसाठी लागणारा निधीच शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याचे सर्व शिक्षाने सांगितले. जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पात्र विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप केले जातात. शिवाय येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा उघडण्यास केवळ सहा दिवस उरले आहेत. परंतु निधीच उपलब्ध न झाल्याने बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन गणवेशांची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी पालकाचे व लाभधारक मुलाचे बँकेत जॉर्इंट खाते काढण्याची अट शासनाने घातली असून ती पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु किती विद्यार्थ्यांचे बँक खाते अद्ययावत झाले आहे, याबाबत शिक्षण विभागाकडे माहिती उपलब्ध झालेली नाही. वेळेत गणवेश वाटपाचे संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले होते. शिवाय शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचनाही दिल्या होत्या. परंतु निधीच उपलब्ध न झाल्याने ‘शाळा उघडताच विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश’ नियोजन बारगळणार असल्याचे दिसून येत आहे. एससी, एसटी व बीपीएलधारक विद्यार्थ्यांसाठी तर सर्व प्रवर्गातील मुलींसाठी शासनाकडून मोफत गणवेश वाटपाची योजना राबविली जाते.