शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

नियोजन १६९ कोटींचे; खर्च ३१ कोटी २३ लाख

By admin | Updated: October 31, 2014 00:34 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितीने सन २०१४-२०१५ साठी १६९ कोटी रूपयांचे नियोजन केले. सप्टेंबरअखेर सुमारे ८१ कोटी रूपये तरतूदही प्राप्त झाली.

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितीने सन २०१४-२०१५ साठी १६९ कोटी रूपयांचे नियोजन केले. सप्टेंबरअखेर सुमारे ८१ कोटी रूपये तरतूदही प्राप्त झाली. परंतु, मागील सात महिन्यांमध्ये ३१ कोटी २३ लाख ५२ हजार रूपये इतकाच खर्च होवू शकला. त्यामुळे उर्वरित निधी खर्च करण्याचे नियोजन समितीसमोर मोठे आव्हान असणार आहे.जिल्ह्याचा समतोल विकास व्हावा, या दृष्टिकोनातून वित्त व नियोजन विभागाकडून निधी आरक्षित केला जातो. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदरील निधी खर्चाचे नियोजन करण्यात येते. प्रशासनाने चालू वर्षी म्हणजेच सन २०१४-२०१५ मध्ये वेगवेगळ्या तीन हेडअंतर्गत सुमारे १६९ कोटी ८७ लाख १४ हजार रूपये इतक्या खर्चाचे नियोजन केले होते. त्यानुसार राज्याच्या वित्त व नियोजन विभागाकडे सदरील निधीची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार सदरील नियतव्यय मंजूरही झाले. यामध्ये सर्वसाधारण योजनेअंतर्गत सुमारे १२५ कोटी रूपये खर्चाचे नियोजन करण्यात आले होते. सप्टेंबर २०१४ अखेर त्यापैकी ६७ कोटी २२ लाख २० हजार रूपये इतकी रक्कम नियोजन समितीकडे प्राप्त झाली असता ५२ कोटी ५३ लाख रूपये हे संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आले असता मागील सात महिन्यांमध्ये यातील २७ कोटी ५२ लाख ८४ रूपये खर्च झाले आहेत. सदरील खर्चाची टक्केवारी ४०.९५ टक्के इतकी आहे. दरम्यान, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गतही समितीकडून तब्बल ४३ कोटी ३३ लाख रूपये खर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतूदही झालेली असून यापैकी १४ कोटी ८ लाख २२ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. ही सर्व रक्कम त्या-त्या यंत्रणेकडे वितरित केली असता सप्टेंबरअखेर साडेतीन कोटी रूपये इतका खर्च झालेला आहे. सदरील खर्चाची टक्केवारी ही फारशी समाधानकारक नाही. प्राप्त तरतुदीच्या प्रमाणात २४.८९ टक्के इतका खर्च झाला आहे. दरम्यान, ‘ओटीएसपी’ योजनेअंतर्गत १ कोटी ५८ लाख १४ हजार रूपये खर्चाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ५०.९५ लक्ष रूपये इतका निधी वितरित करण्यात आला असता २०.३४ लक्ष रूपये खर्च झाले आहेत. याचे प्रमाण ३९.९३ टक्के इतके अत्यल्प आहे. त्यामुळे भविष्यात उर्वरित निधी खर्चाचे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)आजवर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षपद हे आ. मधुकरराव चव्हाण यांच्याकडे होते. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता नियोजन समितीचे अध्यक्षपद कोणाकडे जाते हे पहावे लागणार आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांनाही पायउतार व्हावे लागणार आहे. त्यामुळे समितीला आता नवीन अध्यक्ष व काही सदस्यही मिळणार आहेत. या समितीसमोर उर्वरित निधी खर्चाचे मोठे आव्हान असणार आहे.आ. मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १६९ कोटी रूपये खर्चाचे नियोज करण्यात आले. परंतु, सुरूवातीला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे निधी खर्चास मर्यादा आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.