शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गरजूपर्यंत पोहोंचेनात योजना

By admin | Updated: January 30, 2016 00:25 IST

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या जातात. विशेषत: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खास उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखल्या आहेत.

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या जातात. विशेषत: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खास उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखल्या आहेत. मात्र प्रसार, प्रचाराचा अभाव तसेच प्रशासन आणि गाव पुढाऱ्यांची उदासिनता यामुळे या योजना गरजू लाभार्थ्यांपर्र्यंत प्रभावीपणे पोहंचत नसल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खास योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहंचत नसल्याने शासनाच्या मूळ हेतूला नख लागत असल्याचे दिसून आले. शासकीय योजनांची माहिती आपणापर्यंत पोहंचते का? असा थेट सवाल लोकमतने सर्वेक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विचारला होता. यावर तब्बल ४६ टक्के शेतकऱ्यांनी योजनांची माहिती मिळत नसल्याचे सांगितले. ३३ टक्के शेतकरी कधी-कधी माहिती मिळते असा म्हणतात. तर २१ टक्के शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहंचत नाही असे स्पष्टपणे सांगितले. लोकमतने या सर्वेक्षणावेळी शेतकऱ्यांना आपण एखाद्या शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का? असा प्रश्नही विचारला. यावर २८ टक्के शेतकऱ्यांच्या पदरी कोणत्या न कोणत्या योजनेचा लाभ पडला आहे. मात्र ५५ टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकाही योजनेचा लाभ मिळालेला नसून २७ टक्के शेतकऱ्यांनी काही प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ मिळाला असल्याचे सांगितले. शासन योजना जाहीर करतानाच संबंधित विभागाला विशिष्ट लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे टार्गेट देते. मात्र या योजनेचा लाभ मिळालेला प्रत्येक शेतकरी गरजू असतोच असे नाही. अनेकवेळा एकाच शेतकऱ्याला अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याचेही दिसून आले. त्यामुळेच की काय तब्बल ५९ टक्के शेतकऱ्यांनी गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगत, या योजनेचा लाभ तिसराच कोणी लाटत असल्याचे मत मांडले. ३३ टक्के शेतकऱ्यांनी मात्र गरजूंना योजनेचा लाभ मिळतो, असे सांगितले. तर ८ टक्के शेतकऱ्यांनी याबाबत काहीही सांगता येत नसल्याचे प्रश्नावलीमध्ये नमूद केले.