शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

गरजूपर्यंत पोहोंचेनात योजना

By admin | Updated: January 30, 2016 00:25 IST

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या जातात. विशेषत: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खास उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखल्या आहेत.

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या जातात. विशेषत: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खास उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखल्या आहेत. मात्र प्रसार, प्रचाराचा अभाव तसेच प्रशासन आणि गाव पुढाऱ्यांची उदासिनता यामुळे या योजना गरजू लाभार्थ्यांपर्र्यंत प्रभावीपणे पोहंचत नसल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खास योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहंचत नसल्याने शासनाच्या मूळ हेतूला नख लागत असल्याचे दिसून आले. शासकीय योजनांची माहिती आपणापर्यंत पोहंचते का? असा थेट सवाल लोकमतने सर्वेक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विचारला होता. यावर तब्बल ४६ टक्के शेतकऱ्यांनी योजनांची माहिती मिळत नसल्याचे सांगितले. ३३ टक्के शेतकरी कधी-कधी माहिती मिळते असा म्हणतात. तर २१ टक्के शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहंचत नाही असे स्पष्टपणे सांगितले. लोकमतने या सर्वेक्षणावेळी शेतकऱ्यांना आपण एखाद्या शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का? असा प्रश्नही विचारला. यावर २८ टक्के शेतकऱ्यांच्या पदरी कोणत्या न कोणत्या योजनेचा लाभ पडला आहे. मात्र ५५ टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकाही योजनेचा लाभ मिळालेला नसून २७ टक्के शेतकऱ्यांनी काही प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ मिळाला असल्याचे सांगितले. शासन योजना जाहीर करतानाच संबंधित विभागाला विशिष्ट लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे टार्गेट देते. मात्र या योजनेचा लाभ मिळालेला प्रत्येक शेतकरी गरजू असतोच असे नाही. अनेकवेळा एकाच शेतकऱ्याला अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याचेही दिसून आले. त्यामुळेच की काय तब्बल ५९ टक्के शेतकऱ्यांनी गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगत, या योजनेचा लाभ तिसराच कोणी लाटत असल्याचे मत मांडले. ३३ टक्के शेतकऱ्यांनी मात्र गरजूंना योजनेचा लाभ मिळतो, असे सांगितले. तर ८ टक्के शेतकऱ्यांनी याबाबत काहीही सांगता येत नसल्याचे प्रश्नावलीमध्ये नमूद केले.