शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन लवकर करा, निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:06 IST

औरंगाबाद : आर्थिक वर्ष संपण्यास (मार्च अखेर) केवळ दीड महिना उरला. अद्याप नियोजन नाही. त्यामुळे कधी निविदा काढणार आणि ...

औरंगाबाद : आर्थिक वर्ष संपण्यास (मार्च अखेर) केवळ दीड महिना उरला. अद्याप नियोजन नाही. त्यामुळे कधी निविदा काढणार आणि कधी काम सुरू होणार, असा सवाल जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर नियोजन पुढील १५ दिवसांत सादर करा. निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी प्रशासनाला दिले.

जि. प. स्थायी समितीची ५ फेब्रुवारीला तहकूब बैठक मंगळवारी पार पडली. याप्रसंगी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, सदस्य केशव तायडे, शिवाजी पाथ्रीकर, रमेश गायकवाड, रमेश पवार, किशोर पवार, जितेंद्र जैस्वाल, मधुकर वालतुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, प्रकल्प अधिकारी संगीता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.

ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी देणे, ग्रामीण रस्ते दुरुस्ती गरजेची असताना याच कामांच्या निधीला जिल्हा वार्षिक योजनेतून कात्री लागली. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना याबद्दल प्रशासनाकडून जाब विचारण्यात यावा, असा ठराव बैठकीत घेण्यात आला, तसेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन वाढीव निधीची मागणी करण्यावर एकविचार झाला. जलजीवन मिशनची कामे कधी सुरू होणार, असा जाब उपाध्यक्ष गायकवाड यांनी विचारला. त्यावर तालुकानिहाय सुरू होणाऱ्या कामांची माहिती कार्यकारी अभियंता अशोक घुगे देऊ शकले नाहीत.

---

निधी परत जाण्याबद्दल चिंता

--

तायडे यांनी एकीकडे निधी कपात होतो आणि दुसरीकडे निधी खर्च झाला नाही, असे का होते, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले, तर वालतुरे यांनी नव्याने निधी मिळेल न मिळेल, पण कार्यकाळ संपण्याची वेळ आली आता तरी कामे सुरू करा, अशी मागणी केली. गलांडे यांनी सदस्यांच्या शिफारसी घेऊन नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. बलांडे यांनी बांधकामाचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगत एकही रुपया बांधकाम विभागाचा परत जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.