शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

नियोजन लवकर करा, निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:06 IST

औरंगाबाद : आर्थिक वर्ष संपण्यास (मार्च अखेर) केवळ दीड महिना उरला. अद्याप नियोजन नाही. त्यामुळे कधी निविदा काढणार आणि ...

औरंगाबाद : आर्थिक वर्ष संपण्यास (मार्च अखेर) केवळ दीड महिना उरला. अद्याप नियोजन नाही. त्यामुळे कधी निविदा काढणार आणि कधी काम सुरू होणार, असा सवाल जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर नियोजन पुढील १५ दिवसांत सादर करा. निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी प्रशासनाला दिले.

जि. प. स्थायी समितीची ५ फेब्रुवारीला तहकूब बैठक मंगळवारी पार पडली. याप्रसंगी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, सदस्य केशव तायडे, शिवाजी पाथ्रीकर, रमेश गायकवाड, रमेश पवार, किशोर पवार, जितेंद्र जैस्वाल, मधुकर वालतुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, प्रकल्प अधिकारी संगीता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.

ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी देणे, ग्रामीण रस्ते दुरुस्ती गरजेची असताना याच कामांच्या निधीला जिल्हा वार्षिक योजनेतून कात्री लागली. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना याबद्दल प्रशासनाकडून जाब विचारण्यात यावा, असा ठराव बैठकीत घेण्यात आला, तसेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन वाढीव निधीची मागणी करण्यावर एकविचार झाला. जलजीवन मिशनची कामे कधी सुरू होणार, असा जाब उपाध्यक्ष गायकवाड यांनी विचारला. त्यावर तालुकानिहाय सुरू होणाऱ्या कामांची माहिती कार्यकारी अभियंता अशोक घुगे देऊ शकले नाहीत.

---

निधी परत जाण्याबद्दल चिंता

--

तायडे यांनी एकीकडे निधी कपात होतो आणि दुसरीकडे निधी खर्च झाला नाही, असे का होते, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले, तर वालतुरे यांनी नव्याने निधी मिळेल न मिळेल, पण कार्यकाळ संपण्याची वेळ आली आता तरी कामे सुरू करा, अशी मागणी केली. गलांडे यांनी सदस्यांच्या शिफारसी घेऊन नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. बलांडे यांनी बांधकामाचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगत एकही रुपया बांधकाम विभागाचा परत जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.