शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नियोजन लवकर करा, निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:06 IST

औरंगाबाद : आर्थिक वर्ष संपण्यास (मार्च अखेर) केवळ दीड महिना उरला. अद्याप नियोजन नाही. त्यामुळे कधी निविदा काढणार आणि ...

औरंगाबाद : आर्थिक वर्ष संपण्यास (मार्च अखेर) केवळ दीड महिना उरला. अद्याप नियोजन नाही. त्यामुळे कधी निविदा काढणार आणि कधी काम सुरू होणार, असा सवाल जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर नियोजन पुढील १५ दिवसांत सादर करा. निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी प्रशासनाला दिले.

जि. प. स्थायी समितीची ५ फेब्रुवारीला तहकूब बैठक मंगळवारी पार पडली. याप्रसंगी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, सदस्य केशव तायडे, शिवाजी पाथ्रीकर, रमेश गायकवाड, रमेश पवार, किशोर पवार, जितेंद्र जैस्वाल, मधुकर वालतुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, प्रकल्प अधिकारी संगीता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.

ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी देणे, ग्रामीण रस्ते दुरुस्ती गरजेची असताना याच कामांच्या निधीला जिल्हा वार्षिक योजनेतून कात्री लागली. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना याबद्दल प्रशासनाकडून जाब विचारण्यात यावा, असा ठराव बैठकीत घेण्यात आला, तसेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन वाढीव निधीची मागणी करण्यावर एकविचार झाला. जलजीवन मिशनची कामे कधी सुरू होणार, असा जाब उपाध्यक्ष गायकवाड यांनी विचारला. त्यावर तालुकानिहाय सुरू होणाऱ्या कामांची माहिती कार्यकारी अभियंता अशोक घुगे देऊ शकले नाहीत.

---

निधी परत जाण्याबद्दल चिंता

--

तायडे यांनी एकीकडे निधी कपात होतो आणि दुसरीकडे निधी खर्च झाला नाही, असे का होते, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले, तर वालतुरे यांनी नव्याने निधी मिळेल न मिळेल, पण कार्यकाळ संपण्याची वेळ आली आता तरी कामे सुरू करा, अशी मागणी केली. गलांडे यांनी सदस्यांच्या शिफारसी घेऊन नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. बलांडे यांनी बांधकामाचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगत एकही रुपया बांधकाम विभागाचा परत जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.