शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र जळाल्याने पिंपळगाव घाट गाव अंधारात

By | Updated: November 29, 2020 04:06 IST

केळगाव : रोहित्र जळाल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील ग्रामस्थ तब्बल आठ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त ...

केळगाव : रोहित्र जळाल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील ग्रामस्थ तब्बल आठ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

पिंपळगाव घाट या गावाचा विजेचा पूर्ण भार रोहित्रावर आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी वारंवार संपर्क साधला आहे. तरीदेखील याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. रोहित्र जळाल्यामुळे गावातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागत आहे. तसेच पिकांना पाणी देण्यासाठी पदरमोड करुन शेतकरी डिझेल पंपाचा वापर करीत आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी या हंगामातील कपाशी, अद्रक ही पिके लागवड केलेली आहे. पिके बहरलेली असतानाच रोहित्र जळाल्याने पिकांचे नुकसान होईल या विचाराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच रोहित्र जळाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.याच गावाजवळ केळगाव लघु मध्यमप्रकल्प आहे. या गावासाठी येथूनच पाणी पुरवठा होतो. मात्र, गत आठ दिवसांपासून शेतीलाच नव्हे तर पिण्यासाठीही पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहेत.

कोट

ऐन पाणी देण्याच्या वेळेस रोहित्र जळाल्याने शेतातील पिकेही सुकू लागली आहेत. संबंधित महावितरण कंपनीने रोहित्र आम्हाला त्वरित रोहित्र उपलब्ध करुन द्यावे.

सुरेश सपंत गवळी, शेतकरी

गेल्या आठ दिवसापासून रोहित्र जळाल्याने पिंपळगाव घाट येथील नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. भराडी येथील उपअभियंत्यांना ग्रामपंचायचा ठराव देखील दिलेला आहे. याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

तुकाराम फरकाडे, शेतकरी