शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

‘फिजिक्स’ने विद्यार्थ्यांची, तर पावसाने घेतली पालकांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:03 IST

--- औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट (यूजी) परीक्षा रविवारी शहरातील ४३ केंद्रांवर पार पडली. १५ हजार ...

---

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट (यूजी) परीक्षा रविवारी शहरातील ४३ केंद्रांवर पार पडली. १५ हजार ८५० विद्यार्थांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार ४५० विद्यार्थ्यांनी रविवारी प्रत्यक्ष ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ९७.०५ टक्के एवढे होते, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचे शहर समन्वयक रविंदर राणा यांनी सांगितले.

रविवारी दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान असलेल्या परीक्षेसाठी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रांत प्रवेश देण्यात आले. त्यामुळे ३ तासांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रांवर पाच तासांपेक्षा अधिक काळ काढावा लागला. पाल्यांना परीक्षा केंद्रांवर सोडविण्यासाठी आलेल्या पालकांना महाविद्यालयांनी प्रवेशद्वाराबाहेरच रोखले.

परीक्षेसाठी बुलडाणा, बीड, जालना, परभणीसह विविध जिल्ह्यांतून शहरात आलेल्या पालकांनी महाविद्यालय परिसरात सकाळपासूनच हजेरी लावली होती. अकरा वाजेनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना त्यांना मास्क, सॅनिटाझर, हॅण्डग्लोजचे वाटप करण्यात आले. ओळखपत्र, फोटोची पडताळणी करुन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. पालकांना महाविद्यालयांच्या गेटबाहेरच उभे केले होते. त्यामुळे दिवसभर झालेल्या पावसाने पालकांची जणू परीक्षाच घेतली, अशी प्रतिक्रिया पालकांतून उमटल्या.

---

परीक्षार्थी म्हणाले

आजचा पेपर मध्यम काठीण्य पातळीचा होता. नवीन नियमाप्रमाणे २० प्रश्न या वर्षी जास्त होते. त्याचा फायदा निकालावेळी कळेल. कोरोनाचे नियम पाळून झालेल्या परीक्षेने एकदाचे मनावरचे दडपण दूर झाले.

- अथर्व सोमवंशी, कन्नड येथील परीक्षार्थी

----

बायोलाॅजी विषयाचे प्रश्न अवघड गेले नाहीत. केमिस्ट्रीचे प्रश्न खूप सोपे होते. मात्र, फिजिक्सचे न्यूमरिकल प्रश्न खूपच टफ होते. निगेटिव्ह मार्किंग असल्याने जे प्रश्न आले तेवढेच सोडवले. परीक्षा झाली एकदाची. आता फक्त निकाल लवकर लागावा.

- मुकुंद जमदडे, सिंदखेड राजा येथील परीक्षार्थी

---

वेळच पुरला नाही

या वेळी २० प्रश्न वाढवलेले होते. त्यात फिजिक्सचे न्यूमरिकल आणि थेअरीचे प्रश्न खूप अवघड असल्याने वेळच पुरला नाही. फिजिक्सचे प्रश्न फाॅर्म्युला बेस नव्हते.

- ऋतुजा भंवर, बीडकीन येथील परीक्षार्थी

----

परीक्षेपूर्वी केंद्रात बसून राहावे लागले

जालन्याहून औरंगाबाद गाठून सकाळी ११.४० ला परीक्षा केंद्रात गेले. २ वाजता पेपर सुरु झाला. तोपर्यंत बसून होते. इतर सुविधा केंद्रावर होत्या. २०० प्रश्नांपैकी फिजिक्स विषयाचे प्रश्न अवघड होते. इतर विषयांचे प्रश्न सोपे वाटले.

- वृषाली वाघमारे, जालना येथील परीक्षार्थी

(सर्व प्रतिक्रियांचे फोटो सोडले आहेत)