शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

पीएच.डी. गाईडसाठी सुधारित नियम मंजूर

By admin | Updated: September 27, 2014 00:55 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी रात्री उशिरापर्यंत व्यवस्थापन परिषदेची बैठक चालली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी रात्री उशिरापर्यंत व्यवस्थापन परिषदेची बैठक चालली. अखेर ऐनवेळच्या विषयाची यादी लांबत चालल्यामुळे ही बैठक संस्थगित करून ती निवडणूक झाल्यानंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पेट उत्तीर्ण विद्यार्थी संशोधनापासून वंचित राहू नये म्हणून ‘गाईड’ साठी नियमात सुचविण्यात आलेल्या सुधारणेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अध्यापनाचा ४ वर्षांचा अनुभव असलेल्या महाविद्यालयीन पीएच. डी. धारक प्राध्यापकाला आता ‘गाईडशिप’ मिळणार आहे. याशिवाय दुसऱ्या विद्यापीठातील गाईड अथवा तज्ज्ञ व्यक्तीला या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी गाईडशिप घेता येईल. त्यांना अवघ्या २ विद्यार्थ्यांनाच संशोधनासाठी मार्गदर्शन करण्याची मुभा या बैठकीत देण्यात आली. आपल्या विद्यापीठातील गाईडसाठी संशोधक विद्यार्थ्यांचा ८ चा कोटाआहे. या बैठकीत कान्हेरे समितीच्या शिफारशी लागू केल्या जात नाहीत, या मुद्यावरून खडाजंगी झाली. डॉ. भागवत कटारे यांनी दिलेला क्रीडा संयोजन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा बैठकीसमोर आला असता तो फेटाळण्यात आला.कुलगुरूंनी डॉ. कटारे यांचे मन वळवावे, असे या बैठकीत ठरले.शिवाय संगणक व माहिती तंत्र विभागप्रमुख डॉ. रत्नदीप देशमुख यांचा व्यवस्थापन समिती सदस्यपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यांच्या जागेवर आता डॉ. देवानंद शिंदे यांची वर्णी लावण्यात आली आहे. २०१५-१६ च्या बृहत आराखड्यास या बैठकीत मान्यता देण्यातआली. ‘पेट’धारकांना संशोधनासाठी आता प्रतीक्षेची गरज नाहीव्यवस्थापन परिषदेसमोर ‘गाईड’च्या नियमांमध्ये सुधारणा केलेला ठराव चर्चेला आला. त्यावेळी कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी भूमिका स्पष्ट केली ती अशी की, यापुढे पीएच. डी. पूर्व परीक्षा अर्थात ‘पेट’ एकदा दिल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्याला ती पुन्हा देण्याची गरज नसावी. एकदा ‘पेट’ उत्तीर्ण झाला की, तो संशोधन करण्यासाठी (पीएच.डी.) पात्र समजलाजावा. विद्यार्थ्याला जेव्हा गाईड मिळेल तेव्हा तो संशोधनाला सुरुवात करू शकतो.सध्या प्रचलित नियमानुसार पीएच. डी. धारक महाविद्यालयीन प्राध्यापकाला ५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असला तर तो गाईडसाठी पात्र ठरतो. यापुढे अशा प्राध्यापकांना गाईडशिप मिळण्यासाठी आता ४ वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जाईल.विद्यापीठातील पीएच. डी. धारक प्राध्यापकांसाठी ३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव गाईडसाठी पात्र समजला जाईल.या सुधारित नियमामुळे गाईडची संख्या वाढणार असून ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.