शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारत निर्माण योजनेत गैरव्यवहारप्रकरणी याचिका

By admin | Updated: August 11, 2014 01:56 IST

औरंगाबाद : भारत निर्माण योजनेंतर्गत भायगाव (ता. वैजापूर) येथे झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हे न नोंदविल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या

औरंगाबाद : भारत निर्माण योजनेंतर्गत भायगाव (ता. वैजापूर) येथे झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हे न नोंदविल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने प्रतिवादी जि. प. आणि पं. स.ला नोटिसा काढल्या आहेत.भायगाव येथील भारत निर्माण योजनेच्या कामात ४ लाख १९ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार रावसाहेब कदम यांनी १५ नोव्हेंबर २०१० रोजी वैजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकऱ्यांकडे दिली. ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ साहेबराव कदम यांनी हा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानंतर पं.स. गटविकास अधिकाऱ्यांनी या तक्रारीनुसार चौैकशी करून अहवाल १८ मार्च २०११ रोजी जि. प. मुख्य कार्र्यकारी अधिकाऱ्यांना पाठविला. या चौकशी अहवालानुसार योजनेच्या अध्यक्ष आणि सचिवांना दोषी ठरविण्यात आले होते.त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यवाही न केल्याने प्रशासनाने गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, उपविभाग वैजापूर यांना नोटिसा बजावल्या. या पार्श्वभूमीवर कदम यांनी २ जुलै २०१४ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करावेत. पोलिसांनी त्याच्या अर्जाची दखल घेतली नाही. त्यामुळे कदम यांनी अ‍ॅड. रवींद्र गोरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली. प्राथमिक सुनावणी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. पी.आर. बोरा यांच्यासमोर झाली. पुढील सुनावणाी २० आॅगस्ट रोजी होईल.