शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

भारत निर्माण योजनेत गैरव्यवहारप्रकरणी याचिका

By admin | Updated: August 11, 2014 01:56 IST

औरंगाबाद : भारत निर्माण योजनेंतर्गत भायगाव (ता. वैजापूर) येथे झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हे न नोंदविल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या

औरंगाबाद : भारत निर्माण योजनेंतर्गत भायगाव (ता. वैजापूर) येथे झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हे न नोंदविल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने प्रतिवादी जि. प. आणि पं. स.ला नोटिसा काढल्या आहेत.भायगाव येथील भारत निर्माण योजनेच्या कामात ४ लाख १९ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार रावसाहेब कदम यांनी १५ नोव्हेंबर २०१० रोजी वैजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकऱ्यांकडे दिली. ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ साहेबराव कदम यांनी हा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानंतर पं.स. गटविकास अधिकाऱ्यांनी या तक्रारीनुसार चौैकशी करून अहवाल १८ मार्च २०११ रोजी जि. प. मुख्य कार्र्यकारी अधिकाऱ्यांना पाठविला. या चौकशी अहवालानुसार योजनेच्या अध्यक्ष आणि सचिवांना दोषी ठरविण्यात आले होते.त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यवाही न केल्याने प्रशासनाने गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, उपविभाग वैजापूर यांना नोटिसा बजावल्या. या पार्श्वभूमीवर कदम यांनी २ जुलै २०१४ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करावेत. पोलिसांनी त्याच्या अर्जाची दखल घेतली नाही. त्यामुळे कदम यांनी अ‍ॅड. रवींद्र गोरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली. प्राथमिक सुनावणी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. पी.आर. बोरा यांच्यासमोर झाली. पुढील सुनावणाी २० आॅगस्ट रोजी होईल.