शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

इच्छामरणाची मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:28 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळाबाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.नालेगाव येथील कृषीपंपासाठी अनेक रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. रोहित्र मिळावे, यासाठी ३ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यकारी अभियंता हिंगोली यांच्याकडे पाठपुरवा करूनही रोहित्र मिळालेले नाही. विशेष म्हणजे सध्या शेतकºयांकडे पैसा उपलब्ध नसतानाही शेतकºयांना वीज वितरण कंपनीकडून देयक वसुलीसाठी आडवणूक होत असून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही शेतकºयांनी बाजारामध्ये शेतीमालाचे भाव पडले असूनही कमी भावात माल विकून या रोहित्रावरील शेतकºयांनी तीस हजार रुपये देयके भरणा केलेला आहे. असे असूनही वीज कंपनीकडून अद्यापही रोहित्र न मिळाल्यास आमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने आम्हाला कुटूंबासह आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. नसता शेतकºयांच्या आत्महत्येस वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना जबाबदार धरण्यात यावे, हे अशक्य असेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यामध्ये किसन राखोंडे, शिवाजी राखोंडे, सुदाम राखोंडे, सज्जन राखोंडे, केशव राखोंडे, ज्ञानेश्वर राखोंडे, माणिक राखोंडे, प्रकाश कदम, बापुराव राखोंडे, पांडुरंग राखोंडे, देविदास राखोंडे आदी शेतकºयांनी दिले आहे.