शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

लग्नकार्यासाठी यापुढे महापालिका, पोलिसांची परवानगी आवश्यक

By | Updated: November 28, 2020 04:10 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने हळूहळू अनलॉक अंतर्गत लग्नकार्य तसेच मंगल कार्यालये सुरू केली. मात्र, नागरिक कोरोना नियमांचे पालन ...

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने हळूहळू अनलॉक अंतर्गत लग्नकार्य तसेच मंगल कार्यालये सुरू केली. मात्र, नागरिक कोरोना नियमांचे पालन न करता लग्न करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे आता कोणत्याही लग्नासाठी नागरिकांना महापालिका आणि संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेता लग्न लावल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासन आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.

कोरोना आजाराची दुसरी लाट येणार असल्याचे शासनाने यापूर्वीच सांगितले आहे. नागरिकांनी कोरोनासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे, असे अनेकदा सांगितले. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे प्रशासनाला निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारण्याचा सुरुवात केली आहे. आजही लग्नासाठी फक्त पन्नास नागरिकांना परवानगी असताना पाचशे ते एक हजार नागरिकांपर्यंत आमंत्रण दिल्या जात आहे. मंगल कार्यालय मालक यावर कोणताही आक्षेप घेण्यास तयार नाहीत. दोन दिवसांपूर्वी शहरातील सर्व मंगल कार्यालय चालकांची महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन शेवटचे अल्टिमेटम दिले. त्यानंतर गुरुवारी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नवीन आदेश जारी केले.

औरंगाबाद शहरात लग्न करायचे असेल तर आता संबंधितांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस ठाण्याची परवानगी देखील अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात पालिकेच्या प्रशासकांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत. हे आदेश १ डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. या आदेशानुसार खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

लग्नासाठी परवानगी आवश्यक

लग्नासाठी पन्नास व्यक्तींची मर्यादा देण्यात आली आहे. लग्न समारंभाचे आयोजन करताना संबंधितांना आता महापालिकेची आणि पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पन्नास व्यक्तींची मर्यादा काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्याला मास्कची सक्ती करण्यात आली आहे. सुरक्षित वावर, सॅनिटायझरचा वापर देखील सक्तीचा करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी काहीजण जरी विनामास्क आढळले तरी मंगल कार्यालय चालकावर कारवाई केली जाणार आहे. पहिल्यावेळी पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे, दुसऱ्यांदा मंगल कार्यालय सात दिवसांसाठी सील केले जाणार आहे. त्यानंतर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.