शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

लसच खेचून आणण्यात लोकप्रतिनिधी अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसींची मागणी वाढली आहे. शासन मात्र अवघे ४ ते ५ ...

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसींची मागणी वाढली आहे. शासन मात्र अवघे ४ ते ५ हजार लसीचे डोस देऊन औरंगाबादची बोळवण करीत आहे. त्यामुळे एक दिवस लसीकरण झाले की, लस संपल्याने तीन ते चार दिवस मोहीम बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर ओढावते आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अद्यापही कोरोनावर राजकारण करण्यात मग्न आहेत. या लोकप्रतिनिधींचे सत्तेच्या दरबारातील ‘वजन’ लसीपेक्षाही तोळामोळा असल्याचे सतत उघडे पडत आहे.

औरंगाबाद शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी लसीकरण मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महापालिका प्रशासन आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेने लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र, मागील एक महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्याला अत्यल्प लसींचा साठा दिला जात आहे. शहराला चार ते पाच हजारपेक्षा जास्त लसींचे डोस मिळत नाहीत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी तर ११५ वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्रे उभारली आहेत. मात्र, लस नसल्याने लसीकरणाची संपूर्ण यंत्रणा बसवून ठेवावी लागत आहे.

शनिवारी ५ हजार लस आल्या व तत्काळ संपल्या.

शासनाने शुक्रवारी रात्री महापालिकेला फक्त पाच हजार लस दिल्या. शनिवारी सकाळी २६ केंद्रांवर या लस अवघ्या काही तासांतच संपल्या. जवळपास चार ते पाच हजार नागरिकांना प्रत्येक केंद्रावरून परत फिरावे लागले. मागील एक महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्याला अशाच पद्धतीने सापत्न वागणूक दिली जात आहे.

इतर जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात लस

जालना जिल्ह्याची मागणी अवघ्या १७ हजारांची असताना तब्बल ६० हजार लस देण्यात आल्या. ठाणे जिल्ह्याला ८० हजार लसचा साठा दोन दिवसांपूर्वी देण्यात आला. पुण्यातही लस मोठ्या प्रमाणात दिली जात आहे. मग औरंगाबाद जिल्ह्यावरच वारंवार अन्याय का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दुसरा डोस न मिळाल्याने ४० हजार नागरिक त्रस्त

औरंगाबाद शहरात दुसरा डोस घेण्यासाठी तब्बल ४० हजार नागरिक प्रतीक्षेत आहेत. नियोजित वेळेत दुसरा डोस न मिळाल्यास पहिला डोस वाया जाईल अशी भीती नागरिकांना भेडसावत आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा याचा इन्कार करीत आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव

औरंगाबाद जिल्ह्याला इतर जिल्ह्यांप्रमाणे लस मिळावी यासाठी राजकीय मंडळी आपले वजन राज्य, केंद्र शासनाकडे वापरायला तयार नाही. जिल्ह्यातील राजकीय मंडळी छोटे-मोठे भूमिपूजन, लग्न समारंभ, वाढदिवस, आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत.