शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

लसच खेचून आणण्यात लोकप्रतिनिधी अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसींची मागणी वाढली आहे. शासन मात्र अवघे ४ ते ५ ...

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसींची मागणी वाढली आहे. शासन मात्र अवघे ४ ते ५ हजार लसीचे डोस देऊन औरंगाबादची बोळवण करीत आहे. त्यामुळे एक दिवस लसीकरण झाले की, लस संपल्याने तीन ते चार दिवस मोहीम बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर ओढावते आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अद्यापही कोरोनावर राजकारण करण्यात मग्न आहेत. या लोकप्रतिनिधींचे सत्तेच्या दरबारातील ‘वजन’ लसीपेक्षाही तोळामोळा असल्याचे सतत उघडे पडत आहे.

औरंगाबाद शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी लसीकरण मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महापालिका प्रशासन आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेने लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र, मागील एक महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्याला अत्यल्प लसींचा साठा दिला जात आहे. शहराला चार ते पाच हजारपेक्षा जास्त लसींचे डोस मिळत नाहीत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी तर ११५ वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्रे उभारली आहेत. मात्र, लस नसल्याने लसीकरणाची संपूर्ण यंत्रणा बसवून ठेवावी लागत आहे.

शनिवारी ५ हजार लस आल्या व तत्काळ संपल्या.

शासनाने शुक्रवारी रात्री महापालिकेला फक्त पाच हजार लस दिल्या. शनिवारी सकाळी २६ केंद्रांवर या लस अवघ्या काही तासांतच संपल्या. जवळपास चार ते पाच हजार नागरिकांना प्रत्येक केंद्रावरून परत फिरावे लागले. मागील एक महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्याला अशाच पद्धतीने सापत्न वागणूक दिली जात आहे.

इतर जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात लस

जालना जिल्ह्याची मागणी अवघ्या १७ हजारांची असताना तब्बल ६० हजार लस देण्यात आल्या. ठाणे जिल्ह्याला ८० हजार लसचा साठा दोन दिवसांपूर्वी देण्यात आला. पुण्यातही लस मोठ्या प्रमाणात दिली जात आहे. मग औरंगाबाद जिल्ह्यावरच वारंवार अन्याय का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दुसरा डोस न मिळाल्याने ४० हजार नागरिक त्रस्त

औरंगाबाद शहरात दुसरा डोस घेण्यासाठी तब्बल ४० हजार नागरिक प्रतीक्षेत आहेत. नियोजित वेळेत दुसरा डोस न मिळाल्यास पहिला डोस वाया जाईल अशी भीती नागरिकांना भेडसावत आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा याचा इन्कार करीत आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव

औरंगाबाद जिल्ह्याला इतर जिल्ह्यांप्रमाणे लस मिळावी यासाठी राजकीय मंडळी आपले वजन राज्य, केंद्र शासनाकडे वापरायला तयार नाही. जिल्ह्यातील राजकीय मंडळी छोटे-मोठे भूमिपूजन, लग्न समारंभ, वाढदिवस, आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत.