शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

अंबाजोगाईत जलपुर्नभरणाला लोकसहभागाची जोड

By admin | Updated: May 22, 2016 00:06 IST

अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून

अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून निकामी जलस्रोतांना जीवनदान देण्याचे काम ‘आई’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग आनंदराव चव्हाण यांनी केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंबाजोगाई व परिसरात असणाऱ्या जुन्या तलवातील गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहर व परिसरात पाणी बचतीबाबत त्यांनी जनजागृती सुरू केली. लोकसहभागातून जलसंकटावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी परिसरातील जलस्रोतांना पुनरुज्जीवन कसे मिळेल? यासाठी त्यांनी काम सुरू केले. शहरातील जोगाईवाडी तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल, या उद्देशाने मानवलोकच्या सहकार्याने आई प्रतिष्ठानने गाळ काढणीला सुुरुवात केली. आजतागायत १० हजार ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालेला गाळ शेतकऱ्यांना देण्यात आल्याने जमिनीही सुपीक बनण्यास मदत होणार आहे. जोगाईवाडी तलावापाठोपाठ काळवटी साठवण तलावातील गाळ काढणीचे काम सुरू आहे. आजपर्यंत काळवटी तलावातून ५०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे.मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने ‘बडा तालाब’ निकामी होत चालला होता. या तलावातूनही ७०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. धनेगाव येथील मांजरा धरणातून गाळ काढण्यासाठी मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे. मानवलोकच्या मदतीला आई प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)