शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

अंबाजोगाईत जलपुर्नभरणाला लोकसहभागाची जोड

By admin | Updated: May 22, 2016 00:06 IST

अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून

अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून निकामी जलस्रोतांना जीवनदान देण्याचे काम ‘आई’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग आनंदराव चव्हाण यांनी केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंबाजोगाई व परिसरात असणाऱ्या जुन्या तलवातील गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहर व परिसरात पाणी बचतीबाबत त्यांनी जनजागृती सुरू केली. लोकसहभागातून जलसंकटावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी परिसरातील जलस्रोतांना पुनरुज्जीवन कसे मिळेल? यासाठी त्यांनी काम सुरू केले. शहरातील जोगाईवाडी तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल, या उद्देशाने मानवलोकच्या सहकार्याने आई प्रतिष्ठानने गाळ काढणीला सुुरुवात केली. आजतागायत १० हजार ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालेला गाळ शेतकऱ्यांना देण्यात आल्याने जमिनीही सुपीक बनण्यास मदत होणार आहे. जोगाईवाडी तलावापाठोपाठ काळवटी साठवण तलावातील गाळ काढणीचे काम सुरू आहे. आजपर्यंत काळवटी तलावातून ५०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे.मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने ‘बडा तालाब’ निकामी होत चालला होता. या तलावातूनही ७०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. धनेगाव येथील मांजरा धरणातून गाळ काढण्यासाठी मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे. मानवलोकच्या मदतीला आई प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)