शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

नंबरबांध रस्त्यासाठी तहसीलदारांनी उभारली लोकचळवळ

By admin | Updated: June 26, 2014 00:34 IST

केज: शेतकरी वर्गाला संघर्षमुक्त करण्यासाठी गावपातळीवर लोकचळवळ उभारुन शेतातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न तडजोडीने सोडविण्यासाठी लोकचळवळ मोहीम राबविण्याचा निर्णय केज तहसीलदारनी घेतला आहे.

केज: शेतकरी वर्गाला संघर्षमुक्त करण्यासाठी गावपातळीवर सरपंच पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक यांची लोकचळवळ उभारुन शेतातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न तडजोडीने सोडविण्यासाठी लोकचळवळ मोहीम राबविण्याचा निर्णय केज येथील तहसीलदार शरद झाडके यांनी घेतला आहे. तालुक्यात १२२ गावे त्यापैकी ११३ ग्रामपंचायती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेताच्या बांधावरुन जाणाऱ्या पाऊलवाटासाठी शेतकऱ्यांमधील संघर्ष विकोपाला जातो. त्यातून गटबाजीला उधाण येणे, हाणामारी, पोलिसात तक्रार, न्यायालयीन वार असे प्रकार वाढतात व गाव पातळीवरील शांततेचा भंग होतो. असे प्रकार केज तालुक्यात होऊ नयेत यासाठी केज येथील तहसीलदार शरद झाडके यांनी सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची एक गाव पातळीवर लोकचळवळ उभारण्याचा संकल्प केला आहे.ही लोकचळवळ प्रत्येक गावातील वादग्रस्त नंबर बांध रस्ते, पांदण रस्ते आणि शेतातून जाणारे इतर रस्ते यांच्यामुळे शेतकऱ्यात होणारा संघर्ष टाळून गावातील एकोप्याचे वातावरण कायम राहावे यासाठी प्रत्येक गावात लोकचळवळ उभारण्याच्याकामला गती आली आहे. लोकचळवळ गावातील प्रश्न गावपातळीवर चावडीवर किंवा मंदिरात बसून विचार विनिमयातून सोडविणार आहे. त्यामुळे परस्पर शेतकऱ्यांची भांडणे होणार नाहीत. राष्ट्रीय एकात्मतेचे पालन होईल, गुण्यागोविंदाने नांदता येईल यासाठी लोकचळवळ उभारल्याची माहिती तहसीलदार शरद झाडके यांनी लोकमतशी बोलताना दिली.तहसीलदार झाडके यांनी ही चळवळ उभारुन बंधुभाव जोपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (वार्ताहर)