शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महावितरण, महापालिका, जीटीएलच्या चक्रव्यूहात जनता

By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने एलबीटीची वसुली करण्याचे आदेश जीटीएल कंपनीला दिले आहेत.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने एलबीटीची वसुली करण्याचे आदेश जीटीएल कंपनीला दिले आहेत. तो कर वसूल करून महापालिकेला अदा करावा, असे ते आदेश आहेत. या तिन्ही संस्थांच्या चक्रव्यूहात शहरातील सव्वादोन लाख वीजग्राहक अडकले आहेत. त्यांच्याकडून दरमहा ७० ते ७५ लाख रुपये एलबीटी संकलित करून तो मनपाला जमा करून देण्याची जबाबदारी महावितरणने जीटीएलवर टाकली आहे, तर मनपाला एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१३ या काळातील अंदाजे २० कोटींचा एलबीटी हवा आहे. महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. अशातच दरमहा येणाऱ्या वीज बिलात २ टक्के एलबीटी वाढवून येईल. १ हजार रुपयांची वीज वापरली, तर त्यावर २० रुपये एलबीटी लागणार आहे. मनपातील ९९ वॉर्डांतूनच ही वसुली होणार आहे. एलबीटीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महावितरण कंपनीने १६ आॅक्टोबर २०१४ रोजी एलबीटी वसूल करून मनपाला देण्याचे अथवा मनपाच्या वीज बिलातून कपात करून घेण्याचे आदेश कशासाठी काढले, असा प्रश्न आहे. जीटीएल आणि महावितरण कंपनीत एप्रिल २०११ मध्ये झालेल्या करारानुसार जीटीएलला कोणताही कर अथवा वीज दरवाढीचे अधिकार नाहीत. एमईआरसीच्या सुनावणीनंतर वीज दरवाढ केली जाते, तर कर वसुली ही महावितरणच्या आदेशानुसार एकूण वीज वापरावर लावण्यात येते. एलबीटी वसूल करण्याचा निर्णय महावितरणच्या कक्षेत घेण्यात आला आहे. मनपानेदेखील थकीत एलबीटीसाठी मागील काही महिन्यांत पत्रव्यवहार केलेला नाही. मग अचानक औरंगाबादकरांकडून २० कोटी वसूल करण्याची गरज काय, असा प्रश्न पुढे येतो आहे.