शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड

By | Updated: November 29, 2020 04:07 IST

हिमाचल प्रदेशात कोरडे हवामान सिमला : हिमाचल प्रदेशात आगामी २४ तासांत कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त ...

हिमाचल प्रदेशात कोरडे हवामान

सिमला : हिमाचल प्रदेशात आगामी २४ तासांत कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. लाहौल-स्पिती येथे शनिवारी उणे ९.५ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात सर्वांत कमी तापमान येथे होते. मनालीमध्ये शून्य अंश, तर किन्नौरच्या कल्पामध्ये ०.४ अंश तापमान होते. कुफरी येथे ७.७, तर डलहौसी येथे ८.५ तापमान होते.

फोन कंपनीच्या गोदामाला आग

नोएडा (उत्तर प्रदेश) : एका चिनी मोबाईल फोन कंपनीच्या गोदामाला शनिवारी भीषण आग लागली. खूप लांबवरून या आगीचे लोट दिसत होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अनेक बंब बोलाविण्यात आले होते. दुपारी ५ वाजता लागलेल्या या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या बदलाची चर्चा नाही

बंगळुरू : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या बदलाची चर्चा नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांनी शनिवारी सांगितले. अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. मागील तीन ते चार महिन्यांपासून अशा प्रकारची चर्चा सुरू आहे; परंतु त्यात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना

अमरावती : आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी २०२ कोटी रुपयांच्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मूलभूत सुविधांसाठी १४२ कोटी रुपये, तर आंतरिक स्रोतांसाठी ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

बिडीवरून केली कामगाराची हत्या

नवी दिल्ली : बिडी देण्यास नकार देणाऱ्या कामगाराची तीन जणांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मृत कामगार पश्चिम बंगालच्या मालदा येथील रहिवासी आहे. हे सर्वजण चांगले मित्र होते. तो एकटा धूम्रपान करीत असताना तिघे जण तेथे पोहोचले व नंतर हाणामारी झाली.

अक्षयऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक

जयपूर : राजस्थानमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रात देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. बी. डी. कल्ला यांनी केले. तिसऱ्या जागतिक न्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टच्या राज्यांच्या सत्राला ते संबोधित करीत होते. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये वर्षातील ३६५ पैकी ३२५ दिवस सूर्याची किरणे उपलब्ध असतात. त्यामुळे येथे सौर व पवन ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आकारास येऊ शकतात.

तीन दिवसांत पावसामुळे ८ ठार

अमरावती : आंध्र प्रदेशात मागील तीन दिवस जोरदार पाऊस होत असून, यात ८ जण ठार झाले आहेत. चित्तूर जिल्ह्यात सहा आणि कडप्पा जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी हवाई पाहणीनंतर तिरुपती येथे स्थितीचा आढावा घेतला.