शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

पीकविमा केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:54 IST

जालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कॉमन सर्र्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कॉमन सर्र्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागातील केंद्रांवर पीकविमा भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून सर्रास पैसे उकळले जात आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र समाधानकारक पावसाअभावी सर्वच पिकांची स्थिती नाजूक आहे. काही तालुक्यांत शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पिके वाया गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्ह्यात प्रथमच तालुका व ग्रामपंचायत स्तरावर ७१५ ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सर्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांना मोफत आॅनलाईन पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी काही सर्व्हिस सेंटरवर फॉर्मसाठी दहा व विमा अर्ज आॅनलाईन करण्यासाठी शंभर रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण शिबिरात एकाही पीकविमा केंद्र चालकाने शेतकऱ्यांकडून विमा भरण्यासाठी पैसे घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केंद्र चालकांनी याकडे कानाडोळा केल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे. सातबारा, एकूण जमिनीचा दाखला काढण्यासह पीकपेरा नोंदी घेण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.