शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

पीकविमा केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:54 IST

जालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कॉमन सर्र्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कॉमन सर्र्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागातील केंद्रांवर पीकविमा भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून सर्रास पैसे उकळले जात आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र समाधानकारक पावसाअभावी सर्वच पिकांची स्थिती नाजूक आहे. काही तालुक्यांत शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पिके वाया गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्ह्यात प्रथमच तालुका व ग्रामपंचायत स्तरावर ७१५ ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सर्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांना मोफत आॅनलाईन पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी काही सर्व्हिस सेंटरवर फॉर्मसाठी दहा व विमा अर्ज आॅनलाईन करण्यासाठी शंभर रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण शिबिरात एकाही पीकविमा केंद्र चालकाने शेतकऱ्यांकडून विमा भरण्यासाठी पैसे घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केंद्र चालकांनी याकडे कानाडोळा केल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे. सातबारा, एकूण जमिनीचा दाखला काढण्यासह पीकपेरा नोंदी घेण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.