शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
2
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
3
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
6
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
7
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
8
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
9
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
10
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
11
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
12
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
13
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
14
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
15
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
December Born Astro: डिसेंबरकर दिसायला आकर्षक, पण आळशीपणामुळे गमावतात अनेक संधी!
18
रतन टाटांच्या मृत्युपत्रात सातासमुद्रापलीकडील व्हिला; खरेदीसाठी कोण इच्छुक? पैसे कोणाला मिळणार?
19
Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
20
नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कॉमन सर्व्हिस सेंटरवर भरता येणार पीकविमा

By admin | Updated: July 15, 2017 00:44 IST

जालना : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीकविमा काढून घेण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर ५३६ अधिक डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून पेरणीस प्राधान्य दिले. आतापर्यंत सुमारे ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडावे यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घ्यावा यासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त विमा कंपनीमार्फत पीकविमा काढता येणार आहे. चालू हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा थेट कपात करण्यात येणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडे पीकविम्यासाठी अर्ज सादर करताना सातबारा, पीकपेरा पत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. कृषी विभागाने खाजगी कंपनीच्या माध्यमातून तालुका व गाव पातळीवर सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आॅनलाइन पीकविमा भरता येणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरवर उपलब्ध विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती आॅनलाईन भरल्यानंतर विम्याचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कपात करण्यात येणार आहे. पीकविमा भरणा झाल्यानंतर तसा संदेश शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल.