शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

कॉमन सर्व्हिस सेंटरवर भरता येणार पीकविमा

By admin | Updated: July 15, 2017 00:44 IST

जालना : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीकविमा काढून घेण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर ५३६ अधिक डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून पेरणीस प्राधान्य दिले. आतापर्यंत सुमारे ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडावे यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घ्यावा यासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त विमा कंपनीमार्फत पीकविमा काढता येणार आहे. चालू हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा थेट कपात करण्यात येणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडे पीकविम्यासाठी अर्ज सादर करताना सातबारा, पीकपेरा पत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. कृषी विभागाने खाजगी कंपनीच्या माध्यमातून तालुका व गाव पातळीवर सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आॅनलाइन पीकविमा भरता येणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरवर उपलब्ध विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती आॅनलाईन भरल्यानंतर विम्याचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कपात करण्यात येणार आहे. पीकविमा भरणा झाल्यानंतर तसा संदेश शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल.