शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

कॉमन सर्व्हिस सेंटरवर भरता येणार पीकविमा

By admin | Updated: July 15, 2017 00:44 IST

जालना : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीकविमा काढून घेण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर ५३६ अधिक डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून पेरणीस प्राधान्य दिले. आतापर्यंत सुमारे ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडावे यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घ्यावा यासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त विमा कंपनीमार्फत पीकविमा काढता येणार आहे. चालू हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा थेट कपात करण्यात येणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडे पीकविम्यासाठी अर्ज सादर करताना सातबारा, पीकपेरा पत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. कृषी विभागाने खाजगी कंपनीच्या माध्यमातून तालुका व गाव पातळीवर सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आॅनलाइन पीकविमा भरता येणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरवर उपलब्ध विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती आॅनलाईन भरल्यानंतर विम्याचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कपात करण्यात येणार आहे. पीकविमा भरणा झाल्यानंतर तसा संदेश शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल.