शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

दिवाळीच्या दिवसांतली शांतता जीवघेणी

By | Updated: December 2, 2020 04:06 IST

अनलॉक प्रक्रियेत भारतातील बरीच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्रातही कोकण किनारे, रायगड किल्ला, एलिफंटा लेणी खुली झाली आहे. ...

अनलॉक प्रक्रियेत भारतातील बरीच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्रातही कोकण किनारे, रायगड किल्ला, एलिफंटा लेणी खुली झाली आहे. मात्र, जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी अद्यापही कडी- कुलूपात बंद असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांवरचे आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे.

ऑक्टोबर ते मार्च हा औरंगाबादच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असतो. या काळात विमानापासून ते पर्यटनस्थळांवर असणारे फेरीवाले यांची एकत्रित आर्थिक उलाढाल ५०० कोटींपर्यंत होते. विमान तिकीट, तिकीट बुकींग कार्यालये, टूर ऑपरेटर, टॅक्सी व्यावसायिक, गाईड, हॉटेल, रेस्टॉरंट, फेरीवाले, हस्तकला व्यावसायिक, दुकानदार, पर्यटनस्थळांच्या मार्गावर बसणारे फळ-फूलविकेते या सर्वांचाच उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून असल्याने सर्वांवरच बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

चौकट

५० कोटींची उलाढाल ठप्प

- दिवाळीनंतर केवळ १५ दिवसांच्या सुटीच्या काळात औरंगाबादच्या पर्यटनक्षेत्रातील आर्थिक उलाढाल ५० कोटींच्या घरात होत होती.

- अजिंठा, वेरूळ, मकबरा या ठिकाणी सक्रिय असणाऱ्या गाईडची संख्या ५० आहे. दिवाळीच्या काळात या प्रत्येकाचा व्यवसाय अंदाजे ५० हजार ते १ लाख या दरम्यान व्हायचा. तो आता पूर्णपणे शून्यावर आला आहे.

- हिमरू व्यावसायिकांची खुलताबाद, वेरूळ, अजिंठा याठिकाणी असणारी एकत्रित दुकानांची संख्या जवळपास २५ आहे. दिवाळीच्या पंधरा दिवसांत एका दुकानाचा व्यवसाय दीड ते दोन लाख रुपये एवढा होत होता.

- पर्यटकांना टॅक्सी सुविधा देणाऱ्या व्यावसायिकांची एका दिवसाची उलाढाल ५० हजारांच्या आसपास असायची आता मात्र आठ दिवसांतून ५ हजार रुपयांचीही उलाढाल होत नाही.