शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

दिवाळीच्या दिवसांतली शांतता जीवघेणी

By | Updated: December 2, 2020 04:06 IST

अनलॉक प्रक्रियेत भारतातील बरीच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्रातही कोकण किनारे, रायगड किल्ला, एलिफंटा लेणी खुली झाली आहे. ...

अनलॉक प्रक्रियेत भारतातील बरीच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्रातही कोकण किनारे, रायगड किल्ला, एलिफंटा लेणी खुली झाली आहे. मात्र, जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी अद्यापही कडी- कुलूपात बंद असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांवरचे आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे.

ऑक्टोबर ते मार्च हा औरंगाबादच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असतो. या काळात विमानापासून ते पर्यटनस्थळांवर असणारे फेरीवाले यांची एकत्रित आर्थिक उलाढाल ५०० कोटींपर्यंत होते. विमान तिकीट, तिकीट बुकींग कार्यालये, टूर ऑपरेटर, टॅक्सी व्यावसायिक, गाईड, हॉटेल, रेस्टॉरंट, फेरीवाले, हस्तकला व्यावसायिक, दुकानदार, पर्यटनस्थळांच्या मार्गावर बसणारे फळ-फूलविकेते या सर्वांचाच उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून असल्याने सर्वांवरच बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

चौकट

५० कोटींची उलाढाल ठप्प

- दिवाळीनंतर केवळ १५ दिवसांच्या सुटीच्या काळात औरंगाबादच्या पर्यटनक्षेत्रातील आर्थिक उलाढाल ५० कोटींच्या घरात होत होती.

- अजिंठा, वेरूळ, मकबरा या ठिकाणी सक्रिय असणाऱ्या गाईडची संख्या ५० आहे. दिवाळीच्या काळात या प्रत्येकाचा व्यवसाय अंदाजे ५० हजार ते १ लाख या दरम्यान व्हायचा. तो आता पूर्णपणे शून्यावर आला आहे.

- हिमरू व्यावसायिकांची खुलताबाद, वेरूळ, अजिंठा याठिकाणी असणारी एकत्रित दुकानांची संख्या जवळपास २५ आहे. दिवाळीच्या पंधरा दिवसांत एका दुकानाचा व्यवसाय दीड ते दोन लाख रुपये एवढा होत होता.

- पर्यटकांना टॅक्सी सुविधा देणाऱ्या व्यावसायिकांची एका दिवसाची उलाढाल ५० हजारांच्या आसपास असायची आता मात्र आठ दिवसांतून ५ हजार रुपयांचीही उलाढाल होत नाही.