शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पीकविम्याची रक्कम तातडीने द्या

By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST

जालना : पीकविम्यासाठी जालना जिल्ह्यास १९० कोटी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सदरील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जालना : पीकविम्यासाठी जालना जिल्ह्यास १९० कोटी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सदरील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मंगळवारी येथील सर्वे नं. ४८८ मधील शासकीय विश्रामगृहात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, नायब तहसीलदार यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही निष्काळजीपणा करू नये. जे अधिकारी कामात हयगय किंवा टाळाटाळ करतील त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशी सूचनाही यावेळी लोणीकर यांनी केली. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते, पासबुक आणि आधारकार्ड याची महसूल यंत्रणेकडे नोंदणी करावी. जेणेकरून त्यांना देण्यात येणारे लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करणे सोयीचे होईल, असे आवाहनही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)