शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पैसे द्या, छावणी घ्या !

By admin | Updated: August 26, 2015 00:48 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड एकीकडे जनावराचा चारा संपला म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे पैसे घेऊन चारा छावणीचा प्रस्ताव दाखल करून घेणारी महसूल

व्यंकटेश वैष्णव, बीडएकीकडे जनावराचा चारा संपला म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे पैसे घेऊन चारा छावणीचा प्रस्ताव दाखल करून घेणारी महसूल मधील दलालांची साखळी जिल्ह्यातील तहसील कार्यालयात सक्रिय झाल्याने छावणी चालविण्यास सक्षम असलेल्यांना संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. यामुळे छावण्या जितराबांना जगवतील का? हा प्रश्न निर्माण होत आहे. याचा प्रत्यय मंगळवारी जिल्ह्यात आला. बीडच्या तहसीलदारांनी तर मंगळवारी छावणीचा एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला नसल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन छावण्या तात्काळ सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शिवाय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधीत तहसीलदारांना सुटीच्या दिवशी देखील काम करून चारा परिस्थितीचा आढावा घेवून चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करावेत असे, चारा टंचाई असलेल्या तालुक्यातील तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र, वडवणी वगळता इतर तालुक्यांमध्ये चारा छावणीचे प्रस्ताव पैसे घेऊन दाखल करून घेणारी महसूलची साखळी सक्रीय झाल्याचा प्रत्यय मंगळवारी छावणी सुरू करण्यास इच्छूक असलेल्यांना आला. बीड तहसील कार्यालयात गर्दी जिल्हा प्रशासनाने छावणीचे प्रस्ताव मागितले असल्याने मंगळवारी बीड तहसील कार्यालयात छावणीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. छावणीचा प्रस्ताव टाकतानाच तहसील कार्यालयाकडून पैसे मागितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी दुष्काळाच्या दरम्यान छावणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी कधीच पैसे मागितल्याचा प्रकार घडला नसल्याचे देखील प्रस्ताव देण्यासाठी आलेल्यांनी सांगितले. जाणीवपूर्वक विलंबज्यांचे प्रस्ताव आलेले आहेत त्यापैकी काहीच प्रस्तावांवर स्वाक्षरी करून तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडै पाठविण्याची लगबग काही तहसीलदार करत आहेत.जिल्ह्यातील चारा टंचाईने शेवटचे टोक गाठले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव मागविले असताना देखील बीड तहसीलदार अमोल कदम यांना दुष्काळाचे कसलेच घेणे-देणे नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. मंगळवारी दिवसभरात बीड तहसील कार्यालयाकडून एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला नसल्याने दिवसेंदिवस छावणी सुरू करण्यासाठी विलंब होत आहे.