शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

पैसे द्या, छावणी घ्या !

By admin | Updated: August 26, 2015 00:48 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड एकीकडे जनावराचा चारा संपला म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे पैसे घेऊन चारा छावणीचा प्रस्ताव दाखल करून घेणारी महसूल

व्यंकटेश वैष्णव, बीडएकीकडे जनावराचा चारा संपला म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे पैसे घेऊन चारा छावणीचा प्रस्ताव दाखल करून घेणारी महसूल मधील दलालांची साखळी जिल्ह्यातील तहसील कार्यालयात सक्रिय झाल्याने छावणी चालविण्यास सक्षम असलेल्यांना संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. यामुळे छावण्या जितराबांना जगवतील का? हा प्रश्न निर्माण होत आहे. याचा प्रत्यय मंगळवारी जिल्ह्यात आला. बीडच्या तहसीलदारांनी तर मंगळवारी छावणीचा एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला नसल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन छावण्या तात्काळ सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शिवाय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधीत तहसीलदारांना सुटीच्या दिवशी देखील काम करून चारा परिस्थितीचा आढावा घेवून चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करावेत असे, चारा टंचाई असलेल्या तालुक्यातील तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र, वडवणी वगळता इतर तालुक्यांमध्ये चारा छावणीचे प्रस्ताव पैसे घेऊन दाखल करून घेणारी महसूलची साखळी सक्रीय झाल्याचा प्रत्यय मंगळवारी छावणी सुरू करण्यास इच्छूक असलेल्यांना आला. बीड तहसील कार्यालयात गर्दी जिल्हा प्रशासनाने छावणीचे प्रस्ताव मागितले असल्याने मंगळवारी बीड तहसील कार्यालयात छावणीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. छावणीचा प्रस्ताव टाकतानाच तहसील कार्यालयाकडून पैसे मागितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी दुष्काळाच्या दरम्यान छावणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी कधीच पैसे मागितल्याचा प्रकार घडला नसल्याचे देखील प्रस्ताव देण्यासाठी आलेल्यांनी सांगितले. जाणीवपूर्वक विलंबज्यांचे प्रस्ताव आलेले आहेत त्यापैकी काहीच प्रस्तावांवर स्वाक्षरी करून तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडै पाठविण्याची लगबग काही तहसीलदार करत आहेत.जिल्ह्यातील चारा टंचाईने शेवटचे टोक गाठले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव मागविले असताना देखील बीड तहसीलदार अमोल कदम यांना दुष्काळाचे कसलेच घेणे-देणे नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. मंगळवारी दिवसभरात बीड तहसील कार्यालयाकडून एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला नसल्याने दिवसेंदिवस छावणी सुरू करण्यासाठी विलंब होत आहे.