शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

दंड भरू, बाहेर विनामास्क फिरू; विनाकारण फिरणारे ८८ जण पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये ...

औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. दररोज ४० ते ५० हजार रुपये दंड औरंगाबादकर भरत आहेत. त्याचप्रमाणे कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलीस आणि मनपाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील महिन्यात ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू केले. दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात आली. यानंतरही शहरातील प्रमुख रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरी मित्र पथकाला पुन्हा एकदा शहरात ॲक्टिव्ह केले. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दररोज ५० ते ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. या दंडात्मक कारवाईनंतरही सुधारणा झालेली नाही. मास्कच्या बाबतीत अजूनही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिसेल त्याची कोरोना तपासणी सुरू केली. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण बाधित आढळून आले.

१,३९,१४३

जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

१,२९,८७८

जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्ण

४,५५१

नागरिकांची दीड महिन्यात विनाकारण फिरताना पकडून कोरोना तपासणी.

८८

नागरिक या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले

कारणे नेहमीचीच, किराणा, मेडिकलसाठी बाहेर पडलो...

पोलीस नागरिकांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारत आहेत. प्रत्येक नागरिक मेडिकल घेण्यासाठी आलो होतो, दूध, भाजीपाला, किराणा सामानासाठी... अशी वेगवेगळी कारणे सांगताे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये काम होते. आताच घरातून निघालो. परत निघणार नाही. लहान मुलांचीही कारणे काही पालक सांगतात.

दहा ठिकाणी तपासणी केंद्रे

संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाने दहा पथके तयार केली. पोलिसांच्या मदतीला ही पथके देण्यात आली. दररोज सकाळी दहा ते पाच, सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी तपासणी करण्यात येते. दररोज तीनशे ते चारशे नागरिकांची तपासणी सध्या होत आहे.