शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

दंड भरू, बाहेर विनामास्क फिरू; विनाकारण फिरणारे ८८ जण पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये ...

औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. दररोज ४० ते ५० हजार रुपये दंड औरंगाबादकर भरत आहेत. त्याचप्रमाणे कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलीस आणि मनपाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील महिन्यात ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू केले. दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात आली. यानंतरही शहरातील प्रमुख रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरी मित्र पथकाला पुन्हा एकदा शहरात ॲक्टिव्ह केले. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दररोज ५० ते ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. या दंडात्मक कारवाईनंतरही सुधारणा झालेली नाही. मास्कच्या बाबतीत अजूनही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिसेल त्याची कोरोना तपासणी सुरू केली. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण बाधित आढळून आले.

१,३९,१४३

जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

१,२९,८७८

जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्ण

४,५५१

नागरिकांची दीड महिन्यात विनाकारण फिरताना पकडून कोरोना तपासणी.

८८

नागरिक या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले

कारणे नेहमीचीच, किराणा, मेडिकलसाठी बाहेर पडलो...

पोलीस नागरिकांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारत आहेत. प्रत्येक नागरिक मेडिकल घेण्यासाठी आलो होतो, दूध, भाजीपाला, किराणा सामानासाठी... अशी वेगवेगळी कारणे सांगताे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये काम होते. आताच घरातून निघालो. परत निघणार नाही. लहान मुलांचीही कारणे काही पालक सांगतात.

दहा ठिकाणी तपासणी केंद्रे

संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाने दहा पथके तयार केली. पोलिसांच्या मदतीला ही पथके देण्यात आली. दररोज सकाळी दहा ते पाच, सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी तपासणी करण्यात येते. दररोज तीनशे ते चारशे नागरिकांची तपासणी सध्या होत आहे.