शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

दंड भरू, बाहेर विनामास्क फिरू; विनाकारण फिरणारे ८८ जण पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये ...

औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. दररोज ४० ते ५० हजार रुपये दंड औरंगाबादकर भरत आहेत. त्याचप्रमाणे कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलीस आणि मनपाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील महिन्यात ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू केले. दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात आली. यानंतरही शहरातील प्रमुख रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरी मित्र पथकाला पुन्हा एकदा शहरात ॲक्टिव्ह केले. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दररोज ५० ते ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. या दंडात्मक कारवाईनंतरही सुधारणा झालेली नाही. मास्कच्या बाबतीत अजूनही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिसेल त्याची कोरोना तपासणी सुरू केली. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण बाधित आढळून आले.

१,३९,१४३

जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

१,२९,८७८

जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्ण

४,५५१

नागरिकांची दीड महिन्यात विनाकारण फिरताना पकडून कोरोना तपासणी.

८८

नागरिक या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले

कारणे नेहमीचीच, किराणा, मेडिकलसाठी बाहेर पडलो...

पोलीस नागरिकांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारत आहेत. प्रत्येक नागरिक मेडिकल घेण्यासाठी आलो होतो, दूध, भाजीपाला, किराणा सामानासाठी... अशी वेगवेगळी कारणे सांगताे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये काम होते. आताच घरातून निघालो. परत निघणार नाही. लहान मुलांचीही कारणे काही पालक सांगतात.

दहा ठिकाणी तपासणी केंद्रे

संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाने दहा पथके तयार केली. पोलिसांच्या मदतीला ही पथके देण्यात आली. दररोज सकाळी दहा ते पाच, सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी तपासणी करण्यात येते. दररोज तीनशे ते चारशे नागरिकांची तपासणी सध्या होत आहे.