शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

घाटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण, नातेवाईकांना मोफत जेवण

By admin | Updated: May 12, 2014 00:40 IST

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल येथे मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण येतात.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल येथे मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण येतात. एका रुग्णासोबत किमान दोन ते तीन नातेवाईक असतात. रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची बरीच हेळसांड होते. मागील दोन वर्षांपासून दररोज दोन वेळचे तीनशे ते चारशे रुग्णांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम आॅल इंडिया मजलीस तामीर-ए-मिल्लततर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमास सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही हातभार लावावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यातून आणि बाहेरच्या जिल्ह्यांतून अनेक रुग्ण येतात. रुग्ण बरा होईपर्यंत नातेवाईकांनाही सोबत राहावे लागते. ज्यांचे नातेवाईक औरंगाबादेत राहतात, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. ज्यांचे शहरात कोणीच नाही, त्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांकडे हॉटेलमध्ये जेवण करण्याएवढे पैसेही नसतात. कोणासमोर हात पसरणेही त्यांना योग्य वाटत नाही. त्यापेक्षा चहा, बिस्किटांवर अनेक जण दिवस काढत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांची ही अडचण लक्षात घेऊन तामीर-ए-मिल्लत या संस्थेच्या तरुणांनी ऐतिहासिक पाणचक्कीजवळ दोन वेळ मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला. मशीद जमील बेग परिसरात दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दुपारी १२ ते १ आणि सायंकाळी ७ ते ८ यावेळेत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण दिल्या जाते. नातेवाईकांनी पोटभर घरच्यासारखे जेवण करावे हा प्रयत्न मिल्लतच्या तरुणाईचा असतो. सकाळी आणि सायंकाळी मिळून सुमारे चारशे नागरिक येथे जेवण करतात. ज्या रुग्णांसोबत महिला नातेवाईक आहेत, त्यांना पार्सलद्वारे जेवण देण्याची पद्धत आहे. मागील दोन वर्षांमध्ये मिल्लतच्या तरुणांनी एक दिवसही या उपक्रमात खंड पडू दिला नाही. दररोज चारशे जणांना पोटभर जेवण देणे सोपे नाही. मोठी कसरत करीत ते नागरिकांना जेवण उपलब्ध करून देतात. रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देताना कोणताही भेदभाव आमच्याकडे नाही. माणुसकीच्या नात्याने हा उपक्रम सुरू असल्याचे या संस्थेचे सचिव अब्दुल मोईद हशर यांनी नमूद केले. दानशूर मंडळींचे सहकार्य गरजू व्यक्तींना पोटभर जेवण देण्याच्या या उपक्रमाचे अनेक जणांनी प्रशंसा केली आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही दानशूर मंडळी दाळ, धान्य, तांदूळ, तेल, मसाले, भाजीपाला आणून देतात. शिवाय काही नागरिक आर्थिक मदतही करीत असतात. नागरिकांच्या सहकार्यावरच हा उपक्रम सुरू असल्याचे मिल्लतच्या तरुणांचे म्हणणे आहे.