शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

हाताच्या वेदना सोसत रुग्णाने सोडला दवाखाना

By admin | Updated: May 12, 2017 00:23 IST

कळंब :डॉक्टरांनी एक्सरे काढण्याचा सल्ला दिला. याचवेळी रुग्णालयातील ही सेवा बंद होती. त्यामुळे संबंधित अपघातग्रस्तास हाताच्या वेदना सोसत रुग्णालय सोडावे लागले.

उन्मेष पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघातात जखमी झालेला रुग्ण दाखल होतो. उपस्थित डॉक्टरांकडून त्याच्यावर प्रथमोपचार केले जातात. हाताला जबर मार लागल्यामुळे वेदना असह्य झाल्या होत्या. परंतु, एक्सरे काढल्याशिवाय मार किती व कोठे लागला हे कळू शकणार नाही, असे सांगत डॉक्टरांनी एक्सरे काढण्याचा सल्ला दिला. याचवेळी रुग्णालयातील ही सेवा बंद होती. त्यामुळे संबंधित अपघातग्रस्तास हाताच्या वेदना सोसत रुग्णालय सोडावे लागले.१० मे रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालय परिसरात बिनटाका शस्त्रक्रिया करण्यासाठी तालुक्यातील मंगरुळ, मोहा या भागातून जवळपास ६९ महिला आल्या होत्या. या महिलांसोबत त्यांची लहान मुले व नातेवाईकही होते. या महिलांची नोंदणी तसेच त्यांच्या शस्त्रक्रियापूर्र्व औषधोपचार करण्यासाठी डॉक्टर तसेच परिचारिकांची धावपळ सुरु होती. रुग्णालयात एका वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक तसेच इतर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही रिक्त जबाबदारी भरुन काढावी लागते. या ६९ महिलांना ११ मे रोजी होणाऱ्या शस्त्रक्रिया शिबिरासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने दाखल करुन घेतले व त्यांच्यासोबत एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी दिली.उपजिल्हा रुग्णालयाला दर्जा मिळाला असला तरी येथे ग्रामीण रुग्णालयाच्याही पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. या ६९ महिलांबरोबर आलेल्या त्यांच्या लहान मुलांना व इतर नातेवाईकांना रात्रभर उघड्यावरच मुक्काम करावा लागला. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी येथे धर्मशाळेप्रमाणे एखादी व्यवस्था करावी, अशी मागणी फार जुनी आहे. पण त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे बुधवारी रात्री समोर आलेली रुग्णांच्या नातेवाईकांची परिस्थिती इथे वर्षभर असते, असेही काहीजणांनी सांगितले. काही मंडळींनी रुग्णालयाच्या आवारात तर काही रुग्णालय इमारतीमध्ये जेथे जागा मिळेल तेथे पथारी पसरुन आराम केला. या नातेवार्ईकांना योजनासाठीही विशेष व्यवस्था नसल्याने जेवणही आवारातच आटोपून घ्यावे लागले. रुग्णालय परिसरात भोजन, निवासासाठी वेगळी व्यवस्था करायला हवी, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अडचण जाणवली नाही. परंतु पावसाचा व हिवाळ्यात मोठे हाल होतात, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.