शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रांसाठी खर्चाची मुभा ग्रामपंचायतींमधूनच मिळेल पासपोर्ट

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

विजय सरवदे , औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ५०० ग्रामपंचायतींनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून

विजय सरवदे , औरंगाबादजिल्ह्यातील जवळपास ५०० ग्रामपंचायतींनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना पूर्वीच्या संग्राम सेतू सुविधा केंद्रापेक्षाही अधिकच्या व उच्चतम सुविधा देण्याची तरतूद आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ग्रामपंचायतींची तयारी कळवली आहे. विशेष म्हणजे, या केंद्रांसाठी तज्ज्ञ संगणक परिचालक व अन्य खर्चासाठी चौदाव्या वित्त आयोगातून खर्च करण्यास मुभा देण्यात येणार आहे.सन २०१५ च्या डिसेंबर अखेरपासून ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संग्राम सेतू सुविधा केंद्र बंद झाले. तेव्हापासून बहुतांश ग्रामपंचायतींकडून नागरिकांना संगणकीय प्रमाणपत्रे मिळत नव्हती. संगणक परिचालकांची सेवा संपुष्टात आल्यामुळे जिल्ह्यातील ८०० ते ९०० संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, अलीकडे शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५ लाखांपेक्षा अधिक असेल, त्या ग्रामपंचायती स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र चालवू शकतात.ज्या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न १५ लाखांच्या आत आहे; पण त्या आपले सरकार सेवा केंद्र चालवू इच्छितात किंवा चार-पाच ग्रामपंचायती मिळवून हे केंद्र चालवू इच्छितात, त्यांची नावे कळविण्याचे निर्देश शासनाने दिले होते.जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतला. त्यानुसार १८८ ग्रामपंचायतींनी स्वतंत्रपणे ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालविण्याची तयारी दर्शवली आहे, तर ३०० ग्रामपंचायतींनी चार- पाच ग्रामपंचायती मिळून हे केंद्र चालविण्याची तयारी दर्शवली आहे. आज मंगळवारी पंचायत विभागाने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतीची यादी पाठवली आहे. ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना यापुढे विविध प्रकारचे प्रमाणपत्र, रेल्वे, बसचे आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बँकिंग सेवा, ई-कॉमर्स, पॅन कार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते भरणे, वीजबिल भरणे, पासपोर्ट, पोस्ट विभागाच्या सेवा अशा विविध सुविधा या सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. या केंद्रासाठी चौदाव्या वित्त आयोगातील १० टक्के प्रशासकीय निधीतून अथवा वेळप्रसंगी ९० टक्के विकासकामांच्या खर्चातूनही खर्च करता येणार आहे. औरंगाबाद तालुक्यातील ६६, फुलंब्री तालुक्यातील ३९, सिल्लोड तालुक्यातील ७०, सोयगाव तालुक्यातील २९, कन्नड तालुक्यातील ७४, खुलताबाद तालुक्यातील १८, वैजापूर तालुक्यातील ७७, गंगापूर तालुक्यातील ६१ आणि पैठण तालुक्यातील ५४ अशा एकूण ४८८ ग्रामपंचायतींची नावे शासनाला कळविण्यात आली आहेत.