शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

केंद्रांसाठी खर्चाची मुभा ग्रामपंचायतींमधूनच मिळेल पासपोर्ट

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

विजय सरवदे , औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ५०० ग्रामपंचायतींनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून

विजय सरवदे , औरंगाबादजिल्ह्यातील जवळपास ५०० ग्रामपंचायतींनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना पूर्वीच्या संग्राम सेतू सुविधा केंद्रापेक्षाही अधिकच्या व उच्चतम सुविधा देण्याची तरतूद आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ग्रामपंचायतींची तयारी कळवली आहे. विशेष म्हणजे, या केंद्रांसाठी तज्ज्ञ संगणक परिचालक व अन्य खर्चासाठी चौदाव्या वित्त आयोगातून खर्च करण्यास मुभा देण्यात येणार आहे.सन २०१५ च्या डिसेंबर अखेरपासून ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संग्राम सेतू सुविधा केंद्र बंद झाले. तेव्हापासून बहुतांश ग्रामपंचायतींकडून नागरिकांना संगणकीय प्रमाणपत्रे मिळत नव्हती. संगणक परिचालकांची सेवा संपुष्टात आल्यामुळे जिल्ह्यातील ८०० ते ९०० संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, अलीकडे शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५ लाखांपेक्षा अधिक असेल, त्या ग्रामपंचायती स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र चालवू शकतात.ज्या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न १५ लाखांच्या आत आहे; पण त्या आपले सरकार सेवा केंद्र चालवू इच्छितात किंवा चार-पाच ग्रामपंचायती मिळवून हे केंद्र चालवू इच्छितात, त्यांची नावे कळविण्याचे निर्देश शासनाने दिले होते.जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतला. त्यानुसार १८८ ग्रामपंचायतींनी स्वतंत्रपणे ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालविण्याची तयारी दर्शवली आहे, तर ३०० ग्रामपंचायतींनी चार- पाच ग्रामपंचायती मिळून हे केंद्र चालविण्याची तयारी दर्शवली आहे. आज मंगळवारी पंचायत विभागाने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतीची यादी पाठवली आहे. ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना यापुढे विविध प्रकारचे प्रमाणपत्र, रेल्वे, बसचे आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बँकिंग सेवा, ई-कॉमर्स, पॅन कार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते भरणे, वीजबिल भरणे, पासपोर्ट, पोस्ट विभागाच्या सेवा अशा विविध सुविधा या सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. या केंद्रासाठी चौदाव्या वित्त आयोगातील १० टक्के प्रशासकीय निधीतून अथवा वेळप्रसंगी ९० टक्के विकासकामांच्या खर्चातूनही खर्च करता येणार आहे. औरंगाबाद तालुक्यातील ६६, फुलंब्री तालुक्यातील ३९, सिल्लोड तालुक्यातील ७०, सोयगाव तालुक्यातील २९, कन्नड तालुक्यातील ७४, खुलताबाद तालुक्यातील १८, वैजापूर तालुक्यातील ७७, गंगापूर तालुक्यातील ६१ आणि पैठण तालुक्यातील ५४ अशा एकूण ४८८ ग्रामपंचायतींची नावे शासनाला कळविण्यात आली आहेत.