शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

अत्यावश्यक सेवेला प्रवासी मिळेना, सामान्यांना सेवा देता येईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यात एसटी बसेस या अत्यावश्यक सेवेसाठीच धावत आहेत. पण ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यात एसटी बसेस या अत्यावश्यक सेवेसाठीच धावत आहेत. पण दोन दोन तास उभे राहूनही अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी मिळत नाही आणि ज्यांना कुठे जायचे आहे, ते प्रवासी अत्यावश्यक सेवेत येत नाही, अशी अवस्था सध्या शहरातील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकात पहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५०० बसचा ताफा आहे. परंतु सध्या या बसेस आगारातच उभा करण्याची वेळ ओढवत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे दोन-चार प्रवासी आले तरी बस धावत नाही. कारण उत्पन्नाचा प्रश्न आहे. प्रवासी मिळण्याच्या प्रतीक्षेत बस तास दीड तास फलाटावरच उभी राहते. शेवटी अत्यावश्यक कामांसाठी जाणारे प्रवासी कंटाळून आगाराबाहेर पडतात आणि खासगी वाहनांचा रस्ता धरत असल्याची परिस्थिती आहे. त्या उलट अत्यावश्यक सेवेत नसलेले प्रवासीही अनेक कारणांसाठी गावी जाण्यासाठी बसस्थानकात येतात. पण त्यांना नकार दिला जातो. बस बंद आहे, असे त्यांना सांगितले जाते. त्यामुळे गावी पोहोचण्यासाठी कसरत करण्याची वेळ अनेकांवर ओढवत आहे. तसेच बस जर बंदच राहणार असेल तर केवळ स्वाक्षरीसाठी का बोलावले जाते, असा सवाल चालक-वाहकांकडून विचारला जात आहे.

-------

जिल्ह्यातील एकूण आगार-८

सध्या बसेस चालविल्या जातात-५

प्रवास करणाऱ्यांची संख्या-११०

----

भुसावळला जाण्यासाठी बसस्थानकात बसून

भुसावळ येथे जाण्यासाठी ५ मजूर बुधवारी मध्यवर्ती बसस्थानकात आले होते. तासन‌्तास बसूनही बस येत नव्हती. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकाला विचारणा केली. तेव्हा बस बंद असल्याचे सांगितले. कंपनीतून कमी केल्याने भुसावळ येथून रेल्वेने या मजुरांना उत्तर प्रदेशातील गावी परतायचे होते. शेवटी प्रत्येकी ७०० रुपये मोजून हे सर्व जण खासगी वाहनाने भुसावळला रवाना झाले.

-----

जालन्याची बस भरेना

सिडको बसस्थानकात बुधवारी दुपारी १२.४५ वाजता जालना येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस उभी होती. बसमध्ये एक प्रवासी बसलेला होता. परंतु जोपर्यंत आणखी प्रवासी मिळत नाही, तोपर्यंत बस जाणार नाही, असे चालकाने सांगितले. शेवटी कंटाळून तो प्रवासी बसमधून उतरून निघून गेला.

----

अत्यावश्यक सेवेला प्राधान्य

सध्या ९० टक्क्यांवर बसेस बंद आहेत. त्यातही मंगळवारी ५ बसच धावल्या. ५ ते ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस यांच्यासाठी बसेस धावत आहेत. अत्यावश्यक सेवा देण्याची कधीही गरज पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन चालक-वाहकांना आगारात बोलावले जात आहे.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक

------

फोटो ओळ..

१)मध्यवर्ती बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत असलेले मजूर.

२)सिडको स्थानकात जालन्याला जाण्यासाठी उभी असलेली बस.