शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बसस्थानकासमोरून प्रवासी पळविणे सुरूच

By admin | Updated: January 14, 2017 00:17 IST

तुळजापूर : जिल्ह्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षितता सप्ताह साजरा केला जात आहे़

तुळजापूर : जिल्ह्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षितता सप्ताह साजरा केला जात आहे़ अपघात रोखण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासन जनजागृती करीत आहे़ मात्र, तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील दोन्ही बसस्थानकासमोरून प्रवासी पळविण्याचा प्रकार खासगी वाहनधारकांकडून सुरूच असून, रस्त्यावरच वाहने उभा केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या पाहणीत समोर आला़राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात १०० ते २०० मीटर परिसरात खाजगी वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक होऊन नये असे, दंडक आहेत़ असे असतानाही तुळजापूर शहरातील जुन्या बस्थानकातून व नवीन बसस्थानकासमोरून खासगी वाहनाद्वारे प्रवाशांची पळवापळवी केली जात आहे. तुळजापूर शहरातून १५० ते २०० खाजगी वाहने दररोज अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करतात़ थेट बसस्थानकाच्या आवारातून प्रवासी नेले जात असल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका बसत आहे़ शिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व भरधाव वेगातील वाहतूक यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़ बसस्थानकाच्या काही फूट अंतरावरून सद्यस्थितीत खासगी बास, काळी-पिवळीजीप, टमटम, ट्रॅव्हल्स या वाहनाद्वारे सोलापूर, लातूर, नळदुर्ग, उस्मानाबाद, बार्शी इ. मार्गावर प्रवासी वाहतूक केली जात आहे़ काही महिन्यांपूर्वी आगार प्रमुखांनी बसस्थानकातील प्रवासी पळविणाऱ्या वाहनचालकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते़ विशेष म्हणजे आगाराकडून पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देऊनही संबंधित वाहनांवर कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, उस्मानाबाद, लातूर, नळदुर्ग, सोलापूर या प्रमुख मार्गावर व जुन्या बसस्थानकासमोरील भागात खासगी वाहने उभा राहत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे़ तर दुसरीकडे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतानाही हा प्रकार पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास येत नाहीच कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)