शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

प्रवाशांचा जीव टांगणीला

By admin | Updated: July 23, 2016 01:14 IST

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे.

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे. काळी-पिवळी, खाजगी वाहनांबरोबर छोट्या-मोठ्या मालवाहू गाड्यांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून धोकादायकरीत्या वाहतूक केली जात आहे. यातून अशा अवैध वाहतूकदारांची चांदी होत आहे. प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागत आहे.सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून नदीपात्रात कोसळल्याची घटना बुधवारी पाथ्रीजवळ घडली. या घटनेमुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जालना रोड, हर्सूल रोड, नगर नाका, बीड बायपाससह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची धोकादायक पद्धतीने ने-आण केली जात आहे. रस्त्यावर एखादा प्रवासी दिसत नाही की, त्याच्या भोवती अशा वाहतूकदारांचा गराडा पडतो. कमी पैशात सोडले जाईल, लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाही, सांगेल तेथे गाडी थांबेल, या बाबींमुळे प्रवासी जिवाची पर्वा न करता अशा वाहनांतून धोकादायक प्रवास करतात. काळी-पिवळी वाहनांमध्ये कितीतरी अधिक, प्रसंगी थेट मागे दाराला लटकून प्रवाशांची वाहतूक होताना सर्रास दिसत आहे. चालकाच्या बाजूने तर तीन ते चार प्रवासी कोंबले जात आहेत. अशा परिस्थितीत गाडी चालविण्याची कसरत चालक करतो. एखादा अपघात झाल्यानंतर आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. ‘एसटी’ला प्राधान्य द्याएस.टी.महामंडळाच्या बसगाड्यांचा प्रवास हा नेहमीच सुरक्षित आहे. शिवाय अपघात विम्याच्या रुपाने सुरक्षा कवच आहे.प्रवाशांनी ‘एसटी’तून प्रवास करण्याला प्राधान्य द्यावा,असे एस.टी.महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी एस.एस.रायलवार म्हणाले.मालवाहूंचा वापरप्रवासी वाहतुकीसाठी सर्रास लोडिंग रिक्षापासून छोट्या-मोठ्या मालवाहू वाहनांचा वापर करण्यावर सर्रास भर दिला जातो. अशा वाहनांतून प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरतो. परंतु अनेकदा अशा वाहनांचा प्रवास जिवावर बेतणारा ठरतो. पोलिसांची कारवाई टाळून शहराबाहेर पडण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे. कारवाई सुरूअवैध वाहतुकीविरुद्ध १ जुलैपासून कारवाई केली जात आहे. यामध्ये अतापर्यंत अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहील,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले.