शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

प्रवाशांचा जीव टांगणीला

By admin | Updated: July 23, 2016 01:14 IST

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे.

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे. काळी-पिवळी, खाजगी वाहनांबरोबर छोट्या-मोठ्या मालवाहू गाड्यांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून धोकादायकरीत्या वाहतूक केली जात आहे. यातून अशा अवैध वाहतूकदारांची चांदी होत आहे. प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागत आहे.सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून नदीपात्रात कोसळल्याची घटना बुधवारी पाथ्रीजवळ घडली. या घटनेमुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जालना रोड, हर्सूल रोड, नगर नाका, बीड बायपाससह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची धोकादायक पद्धतीने ने-आण केली जात आहे. रस्त्यावर एखादा प्रवासी दिसत नाही की, त्याच्या भोवती अशा वाहतूकदारांचा गराडा पडतो. कमी पैशात सोडले जाईल, लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाही, सांगेल तेथे गाडी थांबेल, या बाबींमुळे प्रवासी जिवाची पर्वा न करता अशा वाहनांतून धोकादायक प्रवास करतात. काळी-पिवळी वाहनांमध्ये कितीतरी अधिक, प्रसंगी थेट मागे दाराला लटकून प्रवाशांची वाहतूक होताना सर्रास दिसत आहे. चालकाच्या बाजूने तर तीन ते चार प्रवासी कोंबले जात आहेत. अशा परिस्थितीत गाडी चालविण्याची कसरत चालक करतो. एखादा अपघात झाल्यानंतर आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. ‘एसटी’ला प्राधान्य द्याएस.टी.महामंडळाच्या बसगाड्यांचा प्रवास हा नेहमीच सुरक्षित आहे. शिवाय अपघात विम्याच्या रुपाने सुरक्षा कवच आहे.प्रवाशांनी ‘एसटी’तून प्रवास करण्याला प्राधान्य द्यावा,असे एस.टी.महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी एस.एस.रायलवार म्हणाले.मालवाहूंचा वापरप्रवासी वाहतुकीसाठी सर्रास लोडिंग रिक्षापासून छोट्या-मोठ्या मालवाहू वाहनांचा वापर करण्यावर सर्रास भर दिला जातो. अशा वाहनांतून प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरतो. परंतु अनेकदा अशा वाहनांचा प्रवास जिवावर बेतणारा ठरतो. पोलिसांची कारवाई टाळून शहराबाहेर पडण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे. कारवाई सुरूअवैध वाहतुकीविरुद्ध १ जुलैपासून कारवाई केली जात आहे. यामध्ये अतापर्यंत अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहील,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले.