शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

प्रवाशांचा जीव टांगणीला

By admin | Updated: July 23, 2016 01:14 IST

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे.

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे. काळी-पिवळी, खाजगी वाहनांबरोबर छोट्या-मोठ्या मालवाहू गाड्यांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून धोकादायकरीत्या वाहतूक केली जात आहे. यातून अशा अवैध वाहतूकदारांची चांदी होत आहे. प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागत आहे.सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून नदीपात्रात कोसळल्याची घटना बुधवारी पाथ्रीजवळ घडली. या घटनेमुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जालना रोड, हर्सूल रोड, नगर नाका, बीड बायपाससह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची धोकादायक पद्धतीने ने-आण केली जात आहे. रस्त्यावर एखादा प्रवासी दिसत नाही की, त्याच्या भोवती अशा वाहतूकदारांचा गराडा पडतो. कमी पैशात सोडले जाईल, लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाही, सांगेल तेथे गाडी थांबेल, या बाबींमुळे प्रवासी जिवाची पर्वा न करता अशा वाहनांतून धोकादायक प्रवास करतात. काळी-पिवळी वाहनांमध्ये कितीतरी अधिक, प्रसंगी थेट मागे दाराला लटकून प्रवाशांची वाहतूक होताना सर्रास दिसत आहे. चालकाच्या बाजूने तर तीन ते चार प्रवासी कोंबले जात आहेत. अशा परिस्थितीत गाडी चालविण्याची कसरत चालक करतो. एखादा अपघात झाल्यानंतर आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. ‘एसटी’ला प्राधान्य द्याएस.टी.महामंडळाच्या बसगाड्यांचा प्रवास हा नेहमीच सुरक्षित आहे. शिवाय अपघात विम्याच्या रुपाने सुरक्षा कवच आहे.प्रवाशांनी ‘एसटी’तून प्रवास करण्याला प्राधान्य द्यावा,असे एस.टी.महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी एस.एस.रायलवार म्हणाले.मालवाहूंचा वापरप्रवासी वाहतुकीसाठी सर्रास लोडिंग रिक्षापासून छोट्या-मोठ्या मालवाहू वाहनांचा वापर करण्यावर सर्रास भर दिला जातो. अशा वाहनांतून प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरतो. परंतु अनेकदा अशा वाहनांचा प्रवास जिवावर बेतणारा ठरतो. पोलिसांची कारवाई टाळून शहराबाहेर पडण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे. कारवाई सुरूअवैध वाहतुकीविरुद्ध १ जुलैपासून कारवाई केली जात आहे. यामध्ये अतापर्यंत अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहील,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले.