शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

परळीत कोळशाची टंचाई कायम

By admin | Updated: December 3, 2014 00:41 IST

परळी: परळी औष्णिक विद्युत केंद्राला कोळशाची टंचाई भासू लागली आहे. नवीन व जुन्या औष्णिक केंद्रात सध्या २० हजार टन कोळसा शिल्लक आहे

परळी: परळी औष्णिक विद्युत केंद्राला कोळशाची टंचाई भासू लागली आहे. नवीन व जुन्या औष्णिक केंद्रात सध्या २० हजार टन कोळसा शिल्लक आहे. विजनिर्मितीसाठी एका संचाला दररोज अंदाजे ४ हजार टन कोळसा लागतो. सध्या एकुण पाच संचापैकी तीन संचच चालु आहेत. या तीन संचाला दोना दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे संच क्र.४ हा दिवाळीपासून बंद असल्याने या संचातून वीज निर्मिती ठप्प झाली आहे तर संच क्र. ३ हा गेल्या दीड वर्षापासून पाण्याच्या समस्येमुळे बंद ठेवलेला असून अद्याप सुरु केलेला नाही. परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात सध्या दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. जेवढा कोळसा आवश्यक आहे तेवढाचा कोळया येत असल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील सध्या एकच संच चालु असून या ठिकाणी ४ हजार ८०० टन कोळसा शिल्लक आहे तर नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच चालु आहे. या ठिकाणी १६ हजार टन कोळसा उपलब्ध आहे. दररोज एका संचासाठी ४ हजार टन कोळशाची गरज भासते. या संदर्भात परळी औष्णिक केंद्राचे अधिक्षक अभियंता मनोहर खांडेकर म्हणाले, दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे.आज दोन रेल्वे रॅक कोळया येण्याची शक्यता आहे तर विजनिर्मितीसाठी डिसेंबर महिन्यापर्यंत पुरेल एवढाचा पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाच संचापैकी नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. ६, ७ व जुन्या औष्णिक केंद्रातील संच क्र.५ असे एकुण तीन संच चालू आहेत. या तीन संचातून मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ५६७ मेगाव्हॅट विजेचे उत्पादन सुरु होते. (वार्ताहर)गतवर्षी पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्र बंद ठेवावे लागले होते. याचा मोठा फटका वीज निर्मितीवर झाला होता. या वर्षी पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. एका बाजूला कोळसा अल्प प्रमाणात उपलब्ध होत आहे. तर दुसऱ्या बाजूला पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे वीज उत्पादनावर या सर्व बाबींचा परिणाम होण्याची शक्यता आहे.