शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पार्किंगची समस्या; वाहन खरेदी करावे की नाही?

By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे,

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन घेऊनही या शहरात फारसा उपयोग नाही, अशी नागरिकांची मनोभूमिका बनत चालली असल्याचे दिसते. जुन्या शहरात गुलमंडी, औरंगपुरा, सिटी चौक, सराफा, शाहगंज, रोशनगेट, चेलिपुरा, बुढीलेन, दलालवाडी या परिसरात सकाळी व सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते. शहराच्या इतर भागांतून सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक खरेदीसाठी या भागात येतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची गर्दी असते. विशेष करून शनिवारी आणि रविवारी अधिक गर्दी असते. पैठणगेट ते गुलमंडी आणि गुलमंडी ते औरंगपुरा या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही या ठिकाणी वाहतूक खोळंबते. गुलमंडीवर दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ आहे, तर पैठणगेट येथे चारचाकी वाहनांसाठी तळ आहे. मात्र, पैठणगेट येथे वाहन लावून गुलमंडीपर्यंत पायी जाणे अनेक नागरिक टाळतात. शिवाय औरंगपुरा, निराला बाजार या भागांकडून येणाऱ्या चारचाकीधारकांना कोठे वाहन लावायचे, हा प्रश्न सतावत असतो. सिटी चौक भागात तर दुचाकी वाहन लावायलाही जागा नसते. हीच अवस्था शाहगंज आणि बुढीलेन भागात आहे. शहरातील उस्मानपुरा चौक ते श्रेयनगर आणि उस्मानपुरा चौक ते पीरबाजार या भागातही वाहनतळ नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने आढळतात. आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक व पुढे गजानन महाराज मंदिर तसेच समर्थनगर परिसर या भागातही वाहने लावायला जागा नाही, अशी अवस्था आहे. जालना रस्त्यावर चारचाकी वाहन लावायला जागा नसल्याची परिस्थिती रोजच असते. जालना रस्त्यावर अनेक इमारतींच्या पुढे अतिक्रमण झाले असल्याने तसेच महापालिकेचे एकही वाहनतळ नसल्याने अनेक इमारतींच्या समोर रस्त्यावर वाहने दिसतात. परिणामी, या रस्त्यावरूनही वाहन चालविणे नागरिकांना धोकादायक वाटते.