शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शहरात पार्किंगची समस्या; वाहन खरेदी करावे की नाही?

By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे,

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन घेऊनही या शहरात फारसा उपयोग नाही, अशी नागरिकांची मनोभूमिका बनत चालली असल्याचे दिसते. जुन्या शहरात गुलमंडी, औरंगपुरा, सिटी चौक, सराफा, शाहगंज, रोशनगेट, चेलिपुरा, बुढीलेन, दलालवाडी या परिसरात सकाळी व सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते. शहराच्या इतर भागांतून सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक खरेदीसाठी या भागात येतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची गर्दी असते. विशेष करून शनिवारी आणि रविवारी अधिक गर्दी असते. पैठणगेट ते गुलमंडी आणि गुलमंडी ते औरंगपुरा या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही या ठिकाणी वाहतूक खोळंबते. गुलमंडीवर दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ आहे, तर पैठणगेट येथे चारचाकी वाहनांसाठी तळ आहे. मात्र, पैठणगेट येथे वाहन लावून गुलमंडीपर्यंत पायी जाणे अनेक नागरिक टाळतात. शिवाय औरंगपुरा, निराला बाजार या भागांकडून येणाऱ्या चारचाकीधारकांना कोठे वाहन लावायचे, हा प्रश्न सतावत असतो. सिटी चौक भागात तर दुचाकी वाहन लावायलाही जागा नसते. हीच अवस्था शाहगंज आणि बुढीलेन भागात आहे. शहरातील उस्मानपुरा चौक ते श्रेयनगर आणि उस्मानपुरा चौक ते पीरबाजार या भागातही वाहनतळ नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने आढळतात. आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक व पुढे गजानन महाराज मंदिर तसेच समर्थनगर परिसर या भागातही वाहने लावायला जागा नाही, अशी अवस्था आहे. जालना रस्त्यावर चारचाकी वाहन लावायला जागा नसल्याची परिस्थिती रोजच असते. जालना रस्त्यावर अनेक इमारतींच्या पुढे अतिक्रमण झाले असल्याने तसेच महापालिकेचे एकही वाहनतळ नसल्याने अनेक इमारतींच्या समोर रस्त्यावर वाहने दिसतात. परिणामी, या रस्त्यावरूनही वाहन चालविणे नागरिकांना धोकादायक वाटते.