शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

शहरात पार्किंगची समस्या; वाहन खरेदी करावे की नाही?

By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे,

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन घेऊनही या शहरात फारसा उपयोग नाही, अशी नागरिकांची मनोभूमिका बनत चालली असल्याचे दिसते. जुन्या शहरात गुलमंडी, औरंगपुरा, सिटी चौक, सराफा, शाहगंज, रोशनगेट, चेलिपुरा, बुढीलेन, दलालवाडी या परिसरात सकाळी व सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते. शहराच्या इतर भागांतून सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक खरेदीसाठी या भागात येतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची गर्दी असते. विशेष करून शनिवारी आणि रविवारी अधिक गर्दी असते. पैठणगेट ते गुलमंडी आणि गुलमंडी ते औरंगपुरा या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही या ठिकाणी वाहतूक खोळंबते. गुलमंडीवर दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ आहे, तर पैठणगेट येथे चारचाकी वाहनांसाठी तळ आहे. मात्र, पैठणगेट येथे वाहन लावून गुलमंडीपर्यंत पायी जाणे अनेक नागरिक टाळतात. शिवाय औरंगपुरा, निराला बाजार या भागांकडून येणाऱ्या चारचाकीधारकांना कोठे वाहन लावायचे, हा प्रश्न सतावत असतो. सिटी चौक भागात तर दुचाकी वाहन लावायलाही जागा नसते. हीच अवस्था शाहगंज आणि बुढीलेन भागात आहे. शहरातील उस्मानपुरा चौक ते श्रेयनगर आणि उस्मानपुरा चौक ते पीरबाजार या भागातही वाहनतळ नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने आढळतात. आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक व पुढे गजानन महाराज मंदिर तसेच समर्थनगर परिसर या भागातही वाहने लावायला जागा नाही, अशी अवस्था आहे. जालना रस्त्यावर चारचाकी वाहन लावायला जागा नसल्याची परिस्थिती रोजच असते. जालना रस्त्यावर अनेक इमारतींच्या पुढे अतिक्रमण झाले असल्याने तसेच महापालिकेचे एकही वाहनतळ नसल्याने अनेक इमारतींच्या समोर रस्त्यावर वाहने दिसतात. परिणामी, या रस्त्यावरूनही वाहन चालविणे नागरिकांना धोकादायक वाटते.