शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

उद्याने झाली बकाल !

By admin | Updated: February 27, 2017 00:25 IST

उस्मानाबाद : शहरातील प्रमुख असलेल्या जिजामाता उद्यानासह विविध भागात पालिकेने उभारलेल्या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़

उस्मानाबाद : शहरातील प्रमुख असलेल्या जिजामाता उद्यानासह विविध भागात पालिकेने उभारलेल्या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़ त्यामुळे सकाळी-सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर जाणाऱ्या वयोवृध्दांसह बालकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे़उद्याने ही बालकांसह वयोवृध्दांसाठी महत्त्वाची बाब! विशेषत: शहरी भागातील सिमेंटच्या जंगलामध्ये उद्यानाची नितांत आवश्यकता़ शहरी भागात मोकळी हवा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून उद्यानांकडे पाहिले जाते़ ही गरज ओळखून नगर पालिकेकडून शहरातील जिजामाता उद्यानाची निर्मिती केली़ त्यापाठोपाठ मागील काही वर्षात शहरातील तांबरी विभाग, गणेश नगर, समता कॉलनी आदी विविध भागातही उपलब्ध जागेनुसार उद्याने, बगिचे तयार करण्यात आले आहेत़ या उद्यानांची उभारणी करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला आहे़ प्रारंभीचा काळ वगळता नंतर मात्र, देखभाल दुरूस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़ शहरातील प्रमुख उद्यान असलेल्या जिजामाता उद्यानात मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेली अनेक खेळणी खराब झाली आहेत़ येथील वॉकवे, कारंजे, पाळण्यांची मोठी दुरवस्था झाली आहे़ नव्हे अनेक खेळण्यांचे लोखंडही चोरीस गेले आहे़ सद्यस्थितीत काही खेळण्यांचे सांगाडे इथे उभा असून, मिळणाऱ्या मोकळ्या जागेतच लहान मुले आपला वेळ घालवीत आहेत़ विशेषत: या उद्यानाच्या आवारातच शौचास बसणाऱ्यांची संख्या वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे़तांबरी विभागातील मुख्याधिकारी यांच्या निवासस्थाना शेजारीही एक उद्यान तयार करण्यात आले होते़ मात्र, या उद्यानाचेही तीन-तेरा झाले आहेत़ मुख्याधिकाऱ्यांच्या घराशेजारी असलेल्या उद्यानाची ही दुर्दैवी अवस्था पाहता पालिकेकडून उद्यानांच्या देखभाल-दुरूस्तीकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे़ गणेश नगर भागातील बगिचाचीही वेगळी अवस्था नाही़ येथील साहित्याची नासधूस झाली असून, लहान असलेला वॉकवे, संरक्षक भिंतींचीही पडझड झाली आहे़ दरम्यान, याबाबत पालिकेच्या नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही़