शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

उद्यान बंद, पर्यटक माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:04 IST

पैठण : नाताळमुळे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी पैठण नगरीत पर्यटक दाखल झाले, मात्र संत ज्ञानेश्वर उद्यान बंद असल्याने पर्यटकांचा ...

पैठण : नाताळमुळे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी पैठण नगरीत पर्यटक दाखल झाले, मात्र संत ज्ञानेश्वर उद्यान बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे तीनही दिवस आलेल्या हजारो पर्यटकांना उद्यान न पाहताच माघारी परतावे लागले.

मैसूर, वृंदावन येथील उद्यानाच्या धर्तीवर पैठण येथे शासनाने जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर संत ज्ञानेश्वर उद्यानाची उभारणी केली. मात्र, काही दिवसातच संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. कोरोनाकाळात बंद करण्यात आलेले उद्यान अद्यापही खुले करण्यात आलेले नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले करा, अशी मागणी पवन लोहिया यांनी केली आहे. ते म्हणाले की, पैठणचा बहुतांश व्यापार पर्यटनावर अवलंबून आहे. उद्यान बंद असल्याने पर्यटनालाच खीळ बसली आहे. व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यापारी, कामगार यांना याचा मोठा फटका बसत आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान पर्यटक पैठण शहरात हजेरी लावतात.

फोटो : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान बंद असल्याने जिल्हाभरातून आलेल्या पर्यटकांना उद्यानाच्या गेटवरूनच माघारी फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले.