शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आई-वडिलांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : समाजात आणि बदलत्या जगाची परिस्थिती लक्षात घेऊन आई-वडिलांनी आपल्या मुलांना धार्मिक, समाजातील दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे ...

औरंगाबाद : समाजात आणि बदलत्या जगाची परिस्थिती लक्षात घेऊन आई-वडिलांनी आपल्या मुलांना धार्मिक, समाजातील दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे मत मौलाना फारुख वस्तानवी यांनी व्यक्त केले.

जमियत उल उलेमा हिंद (अरशद मदनी) यांच्यातर्फे रोशन गेट परिसरातील अब्बास फंक्शन हॉल येथे 'समाज सुधार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तानवी म्हणाले की, प्रत्येक मुलाला आधुनिक शिक्षण दिले गेलेच पाहिजे. त्यासोबत मुलांना धार्मिक शिक्षण देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या मार्गावर कसे चालावे, हे सुद्धा मुलांना शिकवा. यावेळी मौलाना अरशद मदनी याचे चिरंजीव मौलाना सैयद अजहर मदनी यांनी नमूद केले की, प्रत्येक मुस्लीम बांधव प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर प्रेम करतो. मुंबई येथील मौलाना मुफ्ती हफीजउल्लाह, मौलाना मुफ्ती युसूफ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील इतर धर्मगुरू सहभागी झाले होते, त्यांनी समाजात वाढत असलेल्या चुकीच्या बाबींवर भाष्य केले. शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजीम यांनी तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे, तरुणाईला वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध वसाहतींमध्ये या कामासाठी समित्या नेमाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. वाजीद कादरी यांनीही मुलांना चांगले शिक्षण देण्याची मागणी केली. मौलाना शरीफ निजामी, मौलाना अतीकुर्रहमान शिराजी सल्फी, अतिक पालोदकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुस्तफा खान यांनी केले. हाफिज इकबाल अन्सारी त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मौलाना कैसर खान यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.