शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

चिमुकल्यांच्या मोबाईलवेडाची पालकांना चिंता

By admin | Updated: July 15, 2017 00:13 IST

हिंगोली : मोबाईलच्या सतत वापरामुळे चिमुकल्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुलांना चष्मा लागणे, शिवाय डोळ्याचे विविध आजारांचे चिमुकले शिकार बनत चालले आहेत.

दयाशील इंगोले, संतोष भिसे । लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोबाईलच्या सतत वापरामुळे चिमुकल्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुलांना चष्मा लागणे, शिवाय डोळ्याचे विविध आजारांचे चिमुकले शिकार बनत चालले आहेत. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूरच ठेवावे असा डॉक्टरांतून सल्ला जरी असला तरी दिवसेंदिवस मोबाईलकडे लहान मुलांचा कल वाढतच असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले. मोबाईलसाठी लहान मुलांकडून होणारा हट्ट त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. जवळपास सर्वांकडेच आता अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये गेम खेळणे किंवा लहान मुल रडत असल्यास त्याची समजूत काढण्यासाठी घरातील मंडळी चिमुकल्यांच्या हाती मोबाईल देतात. परंतु नकळत त्यांना मोबाईल वापराची सवय जडत जाते. मोबाईलकडे लहान मुलांचा कल वाढतोय असे म्हणणारे जास्त आहेत. तर नाही म्हणणारे कमी आहेत. मोबाईलवर लहान मुले जास्त वेळ खेळतात, असे म्हणणारे कमी आहेत. अर्धा तास मुले मोबाईलव खेळतात, यांची संख्या जास्त तर खेळूच देत नाही म्हणणारे बोटावर मोजता येतील एवढे आहेत. कुटुंबातील एका सदस्याकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल जास्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दोन व तीन मोबाईल आहेत, असे म्हणणारे फार कमी आहेत. प्रत्येक वेळी त्यांना मोबाईल देणे शक्य नसते, अशावेळी चिमुकले चिडचिड करतात, तर काही मुले पालकांनी सांगितलेले काम ऐकत नाहीत, असे म्हणणारे काही प्रमाणात आहेत. तर काही जण अभ्यासाकडेही दुर्लक्ष करतात असे म्हणणारे सर्वात कमी आहेत. मुलांना काही प्रमाणात मोबाईल दिला पाहिजे होय म्हणणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे, तर नाहीच म्हणणारे त्यापेक्षा कमी तर काही प्रमाणात मोबाईल मुलांच्या हाती द्यावा म्हणणारे जास्त प्रमाणात आहेत.लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावा किंवा नाही, याबाबत पालकांत संभ्रम आहे. दिल्यास मोबाईल वापरण्याची सवय जडल्यास लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार, हे मात्र निश्चित आहे. याबाबत डॉ.गोपाल कदम म्हणाले, लहान मुलांमधील मोबाईलमॅनिया वाढत आहे. मात्र मुलांना ही सवय न लागण्याची काळजी पालकांनीच घेणे गरजेचे आहे. त्यापेक्षा त्यांना मैदानी खेळांकडे वळविले पाहिजे. त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. पूर्वी मोठे कुटुंब असल्याने आई-वडिलांशिवाय इतरांचे मुलांवर लक्ष असायचे. आता त्रिकोणी कुटुंबात ते शक्य होत नाही. मग मोबाईल मुलांच्या हाती दिला जातो. जेकी अत्यंत चुकीचे आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. एवढेच काय तर मोबाईल गरज म्हणून दिला तरीही किशोरवयीन मुलेही मोबाईलचा वापर नेमका कसा करतात, हेसुद्धा पालकांनी तपासले पाहिजे.