शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:02 IST

मोफत शिक्षण - प्रतिसाद का नाही त्याची कारणमिमांसा करा, आरटीई पालक संघाची मागणी योगेश पायघन औरंगाबाद : आरटीईतून ...

मोफत शिक्षण - प्रतिसाद का नाही त्याची कारणमिमांसा करा, आरटीई पालक संघाची मागणी

योगेश पायघन

औरंगाबाद : आरटीईतून प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या ११ जूनपासून आतापर्यंत केवळ १,९४२ प्रवेश निश्चित झाले. हे प्रमाण केवळ ५३ टक्के आहे. तर १,२८२ पाल्यांचे तात्पुरते प्रवेश झाले असून अद्याप ४०१ पालकांनी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना २३ जुलैपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ६०३ शाळांत ३,६२५ आरटीई जागांसाठी ३,४७० विद्यार्थ्यांची सोडतीतून निवड करण्यात आली. त्यासाठी पालकांना ११ ते ३० जून पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करायची होती. त्याला पहिल्यांदा ९ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली त्यानंतर आता २३ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ १,९४२ प्रवेश निश्चित झाले. तर १,२८२ पाल्यांचे तात्पुरते प्रवेश झाले. आतापर्यंत केवळ १,९४२ प्रवेश निश्चित झाले. तर १,२८२ पाल्यांचे तात्पुरते प्रवेश झाले. पालकांनी शाळेत जाऊन लवकर प्रवेश निश्चिती करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

शाळा चालकांकडून शासन परिपूर्ती देत नाही म्हणून पालकांची अडवणूक करुन शुल्काची मागणी केली जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना गरज असताना प्रतिसाद का मिळत नाही. त्यामागची कारणे शोधण्याची गरज असून आरटीई प्रवेश प्रक्रियेला गतिमान करा. शाळांकडून पालकांची होणारी अडवणूक थांबवण्याची मागणी आरटीई पालक संघाने केली आहे.

---

दुसऱ्यांदा मुदतवाढ

--

आरटीई प्रवेश निश्चितीची प्रक्रिया ११ जूनपासून सुरु झाली. त्यासाठी सुरुवातीला २० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, त्यात पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. तरीही प्रवेश पूृर्ण न झाल्याने आता २३ जुलैपर्यंत पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चितीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

----

आरटीई परतावा शासन कधी देणार ?

---

आरटीई प्रवेश विद्यार्थ्यांना देत आहेत. मात्र, कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शाळांचे हक्काचे आरटीईच्या परताव्याचे पैसे शासनाने तत्काळ द्यायला पाहिजे. शाळा चालवणे अवघड झाले असून मनुष्यबळाचे वेतन करण्यातही अडचणी येत आहे. शासनाने शाळांच्या अडचणीही समजून घ्याव्या.

-प्रल्हाद शिंदे-मेसा इंग्रजी शाळा संघटना

----

पालकांच्या अडचणी काय ?

--

पहिल्या २० दिवसात केवळ ७१७ प्रवेश झाले. दुसऱ्यांदा मिळालेल्या मुदतवाढीत पालकांनीही शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करुन घ्यावा. पालक का प्रतिसाद देत नाहीत. याची कारणे शिक्षण विभागाने शोधली पाहिजे. शासन वेळेवर आरटीईचा परतावा देत नाही हे सत्य असले तरी शाळांकडून पालकांची अडवणूक योग्य नाही. यासंदर्भात निदर्शने, निवेदने देऊन पालकांच्या हक्कासाठी लढत आहोत.

-प्रशांत साठे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ

---

सातारा परिसरातील शाळेत माझ्या पाल्यासह सहा जणांचा लाॅटरीत नंबर लागला. शाळेत प्रवेशाला गेलो. तर तिथे शाळा बंद होती. संस्थाचालकाला संपर्क केला तर त्यांनी शाळा सध्या बंद केली असल्याचे सांगितले. आता प्रवेश कुठे करायचे म्हणून शिक्षण विभागात खेटे मारत आहोत.

-अस्लम शेख पालक

---

शाळांनी टाळाटाळ करु नये

--

आरटीई प्रवेशाला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. शाळांंनी पालकांची कुठल्याही प्रकारे अडवणूक, टाळाटाळ करु नये. तर पालकांनीही सहकार्य करावे. निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांना बोलावून त्यांची प्रवेश निश्चिती गतीने पूर्ण करुन घ्यावी अशा सूचना शाळांनाही दिल्या आहेत.

पालकांनीही प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद द्यावा.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

----