शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पालक झटकताहेत जबाबदारी

By admin | Updated: June 29, 2014 00:35 IST

बीड : शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक आपल्या मुलांप्रती असलेली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते.

बीड : शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक आपल्या मुलांप्रती असलेली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते. केवळ गुणवत्ता वाढावी, या हेतूने शिकवण्या लावल्या जातात. मात्र, त्यात सुधारणा होतेच असे नाही. उलट त्याचा मुलांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा पालकांशी संवाद कमी होत चालला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी शहरातील वाढत्या ‘शिकवणी कल्चर’वर प्रतिक्रिया व्यक्त केली.मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वेळ नसल्याने, तसेच गुणवत्तावाढीसाठी पालकांचा कल खासगी शिकवण्यांकडे जास्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. पूर्वी ज्या मुलाला शिकवणी आहे, तो मुलगा अभ्यासात मागे असणार, असे समजले जायचे. आता मात्र ज्या मुलांना शिकवणी नाही, त्यांची गुणवत्ता कमी असते, असा समज निर्माण होत चालला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलांच्या गुणवत्तेसाठी शाळा आणि पालकांनीच प्रयत्न करायला हवेत. शिकवणी लावून पालक विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याचा उलट परिणाम होताना दिसतो. पालकही आपली जबाबदारी झटकत असल्याचे हे लक्षण आहे. पालकांनी मुलांना घरीच जास्त वेळ दिल्यास त्यांच्यातील संवाद वाढण्यासही मदत होईल. मुलांमध्ये आत्मविश्वासही वाढीस लागेल, असे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)अगदी लहानपणापासून शिकवणी लावल्यामुळे मुलांवर ताण येतो. त्यांना कमीत-कमी वेळ हा खेळण्यासाठी दिला जातो. मुलांना शिकवणी लावल्याशिवाय त्यांची उजळणी होणार नाही, त्यांचा चांगला अभ्यास होणार नाही, अशी पालकांची मानसिकता झाली आहे. शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे शिक्षकांचा जोर असतो. त्यामुळे शिकवण्याच्या चुकीच्या पद्धती अवलंबल्या जातात. शिकवणी लावून पालक आपल्या पाल्याची अभ्यासाची जबाबदारीच झटकून टाकताना दिसत आहेत. आपल्या पाल्याचा अभ्यास घरीच घेतल्याने पालक आणि पाल्य यांमधील संवाद वाढतो. त्याच्या शाळेतील अडचणी कळतात. कमीत-कमी पालकांनी आपल्या पाल्याचा अभ्यास तपासणे गरजेचे आहे. - प्र. ल. गावडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञशिकवणी ही एक समांतर शिक्षण व्यवस्था आहे. आताची शिक्षण व्यवस्था ही ’मार्क्सवादी’ झाल्याने पालक शिकवणीचा अवलंब करताना दिसत आहेत. जो-तो गुणवत्ता कशी वाढेल, यावर भर देत आहे. जुन्या काळात शिकवणी लावणे हे कमी दर्जाचे मानले जायचे; परंतु हल्लीच्या काळात शिकवणी लावणे हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात आहे. आपले पाल्य स्पर्धेत टिकून राहावे यासाठी जास्तीत-जास्त अभ्यासात गुंतवण्यासाठी शिकवणी हा उत्तम पर्याय आहे, अशी पालकांची भावना झाली आहे. - डॉ. न. म. जोशीज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञपालकांना मुलांना वेळ देता येत नाही, त्यामुळे शिकवण्या लावल्या जातात. हे प्रमाण चिंताजनक आहे. खासगी शिकवण्या लावल्यामुळे मुले स्वत: अभ्यास करत नाहीत. ते आळशी बनत चालले आहेत. त्यांना स्वत: अभ्यास करण्याची सवय लागली पाहिजे. शिकवण्यांमुळे मुलांची शाळेतील गुणवत्ता वाढते, पण स्पर्धा परीक्षेत त्यांची खरी गुणवत्ता दिसून येते. त्यात ते मागे पडत आहेत. शिकवणी लावल्यामुळे आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळेल, असा पालकांचा समज आहे. पण हीच गोष्ट त्यांच्यासाठी मारक ठरत आहे. - अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञमाझा मुलगा अकरावीला आहे. पण त्याचा आणि त्याच्या बरोबरीच्या मुलांचाही अभ्यासाविषयीचा ‘अ‍ॅप्रोच कॅज्युअल’ आहे. घरी अभ्यास करायला ऐकतच नाही. त्यामुळे शिकवणी लावावीच लागते. आताच्या पद्धती आणि आमच्या वेळच्या यात फार फरक आहे. आमच्यावेळी फार सोप होतं. त्या पद्धतीने मुलांना शिकवायला गेलं की ते त्यांना पटत नाही आणि समजतही नाही. आणि शाळेतलं शिकवणं पुरेस ठरू शकतं, जर मुलांना शंका विचारल्या तर. शाळेत एवढ्या मुलांसमोर शंका विचारणे मात्र मुलांना कमीपणाचे वाटते. शिकवणीला जाण्या-येण्यात ४ तास तर सहज जातात. शिवाय मुलांना घरी अभ्यास करायचा नसतो, त्यामुळे शिकवणी अपरिहार्य असते. - बापूसाहेब सोळंके माझा मुलगा नववीला आहे. मी या वर्षीच त्याला शिकवणी लावली. आतापर्यंत मी त्याला शिकवणी लावली नाही, कारण मी स्वत: डॉक्टर आहे. माझ्या शिक्षणाचा काय उपयोग मग? परंतु मुले घरी अभ्यास करण्याचे ऐकतच नाहीत. शाळेतही नीट शिकवत नाहीत. एकदाच शिकवलं की पुन्हा त्या मुलांना समजले की नाही, हे जाणून न घेताच पुढे सरकतात. त्यामुळे सराव होत नाही. त्यामुळे शिकवणी सरावासाठी आवश्यक असते. घरी सराव घेता येऊ शकतो, मात्र आधीच मुलांचा कल खेळण्याकडे असतो. त्यातही बसवलंच अभ्यासाला तर जरा आईची पाठ फिरली, की मुलं लगेच दुसरीकडे गुंततात. घरात मुलांचे लक्ष विचलित होण्यासाठी टी.व्ही.सारख्या अनेक गोष्टी असतात. या उलट शिकवणीत इतर मुलांच्या बरोबरीने अभ्यासाचे वातावरण असते. - डॉ. उज्ज्वला वनवे