शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

परभणीकरांच्या घशाला लाल फितीमुळे कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:35 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.परभणी शहराला राहटी बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. राहटीमध्ये येलदरी धरणातील पाणी सोडण्यात येते. दर दीड महिन्याला महानगरपालिका पूर्णा पाटबंधारे विभागाला या पाण्यापोटी पाच लाख रुपयांचा निधी देते. हे नियमित चक्र आहे. असे असतानाही वेळीच काळजी घेतली गेली नसल्याने शहरवासियांना १७, १८ व १९ नोव्हेंबर असे तीन दिवस निर्जळीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रारंभी मनपाने या संदर्भात नियोजन वेळेत केले नसल्याचे दिसून आले. पाणीसाठा संपत आल्याची चाहूल लागल्यानंतर या विभागाच्या अधिकाºयांनी पूर्णा पाटबंधारे विभागाला पत्र देऊन बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी केली पाहिजे. परंतु, तसे झाले नाही. १३ नोव्हेंबर रोजी मनपाने जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना राहटीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र दिले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी हे पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला पाठवून दिले. १५ नोव्हेंबर रोजी या विभागाचे वसमत येथील कार्यकारी अभियंता बी.एम.आंबेकर हे रजेवर असल्याने या विषयी निर्णय झाला नाही. १६ नोव्हेंबर रोजी आंबेकर यांनी या पत्रावर कारवाई करुन संबंधित अधिकाºयांना अलर्ट दिला व पाणी सोडण्याचे आदेश दिले. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून राहटीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. महानगरपालिका शहरात तीन दिवस निर्जळी असल्याचे सांगून मोकळी झाली. परंतु, प्रत्यक्षात मात्र शहरवासियांना तब्बल १० दिवसानंतर पाणी मिळते. त्यात पुन्हा तीन दिवस वाढले. ज्या तीन दिवसांमध्ये शहराच्या संबंधित भागात पाणीपुरवठा होणार होता. त्याचे रोटेशन पुढे ढकलले गेले. त्यामुळे ही प्रक्रिया नियमित होण्यासाठी अधिकचे दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे जवळपास १५ दिवसानंतर शहराच्या अनेक विभागांना पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरवासियांनामधून संताप व्यक्त केला जात आहे. अधिकाºयांचा नियोजनशून्य कारभार आणि कागदी घोडे नाचविण्याची प्रक्रिया यामुळेच हिवाळ्यात शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे शहरवासियांना १५ दिवसाला पाणी मिळणार असले तरी यावर मनपातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्य मूग गिळून बसले आहेत.