शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

परभणीकरांच्या घशाला लाल फितीमुळे कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:35 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.परभणी शहराला राहटी बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. राहटीमध्ये येलदरी धरणातील पाणी सोडण्यात येते. दर दीड महिन्याला महानगरपालिका पूर्णा पाटबंधारे विभागाला या पाण्यापोटी पाच लाख रुपयांचा निधी देते. हे नियमित चक्र आहे. असे असतानाही वेळीच काळजी घेतली गेली नसल्याने शहरवासियांना १७, १८ व १९ नोव्हेंबर असे तीन दिवस निर्जळीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रारंभी मनपाने या संदर्भात नियोजन वेळेत केले नसल्याचे दिसून आले. पाणीसाठा संपत आल्याची चाहूल लागल्यानंतर या विभागाच्या अधिकाºयांनी पूर्णा पाटबंधारे विभागाला पत्र देऊन बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी केली पाहिजे. परंतु, तसे झाले नाही. १३ नोव्हेंबर रोजी मनपाने जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना राहटीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र दिले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी हे पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला पाठवून दिले. १५ नोव्हेंबर रोजी या विभागाचे वसमत येथील कार्यकारी अभियंता बी.एम.आंबेकर हे रजेवर असल्याने या विषयी निर्णय झाला नाही. १६ नोव्हेंबर रोजी आंबेकर यांनी या पत्रावर कारवाई करुन संबंधित अधिकाºयांना अलर्ट दिला व पाणी सोडण्याचे आदेश दिले. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून राहटीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. महानगरपालिका शहरात तीन दिवस निर्जळी असल्याचे सांगून मोकळी झाली. परंतु, प्रत्यक्षात मात्र शहरवासियांना तब्बल १० दिवसानंतर पाणी मिळते. त्यात पुन्हा तीन दिवस वाढले. ज्या तीन दिवसांमध्ये शहराच्या संबंधित भागात पाणीपुरवठा होणार होता. त्याचे रोटेशन पुढे ढकलले गेले. त्यामुळे ही प्रक्रिया नियमित होण्यासाठी अधिकचे दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे जवळपास १५ दिवसानंतर शहराच्या अनेक विभागांना पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरवासियांनामधून संताप व्यक्त केला जात आहे. अधिकाºयांचा नियोजनशून्य कारभार आणि कागदी घोडे नाचविण्याची प्रक्रिया यामुळेच हिवाळ्यात शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे शहरवासियांना १५ दिवसाला पाणी मिळणार असले तरी यावर मनपातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्य मूग गिळून बसले आहेत.