शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीकरांच्या घशाला लाल फितीमुळे कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:35 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.परभणी शहराला राहटी बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. राहटीमध्ये येलदरी धरणातील पाणी सोडण्यात येते. दर दीड महिन्याला महानगरपालिका पूर्णा पाटबंधारे विभागाला या पाण्यापोटी पाच लाख रुपयांचा निधी देते. हे नियमित चक्र आहे. असे असतानाही वेळीच काळजी घेतली गेली नसल्याने शहरवासियांना १७, १८ व १९ नोव्हेंबर असे तीन दिवस निर्जळीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रारंभी मनपाने या संदर्भात नियोजन वेळेत केले नसल्याचे दिसून आले. पाणीसाठा संपत आल्याची चाहूल लागल्यानंतर या विभागाच्या अधिकाºयांनी पूर्णा पाटबंधारे विभागाला पत्र देऊन बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी केली पाहिजे. परंतु, तसे झाले नाही. १३ नोव्हेंबर रोजी मनपाने जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना राहटीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र दिले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी हे पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला पाठवून दिले. १५ नोव्हेंबर रोजी या विभागाचे वसमत येथील कार्यकारी अभियंता बी.एम.आंबेकर हे रजेवर असल्याने या विषयी निर्णय झाला नाही. १६ नोव्हेंबर रोजी आंबेकर यांनी या पत्रावर कारवाई करुन संबंधित अधिकाºयांना अलर्ट दिला व पाणी सोडण्याचे आदेश दिले. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून राहटीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. महानगरपालिका शहरात तीन दिवस निर्जळी असल्याचे सांगून मोकळी झाली. परंतु, प्रत्यक्षात मात्र शहरवासियांना तब्बल १० दिवसानंतर पाणी मिळते. त्यात पुन्हा तीन दिवस वाढले. ज्या तीन दिवसांमध्ये शहराच्या संबंधित भागात पाणीपुरवठा होणार होता. त्याचे रोटेशन पुढे ढकलले गेले. त्यामुळे ही प्रक्रिया नियमित होण्यासाठी अधिकचे दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे जवळपास १५ दिवसानंतर शहराच्या अनेक विभागांना पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरवासियांनामधून संताप व्यक्त केला जात आहे. अधिकाºयांचा नियोजनशून्य कारभार आणि कागदी घोडे नाचविण्याची प्रक्रिया यामुळेच हिवाळ्यात शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे शहरवासियांना १५ दिवसाला पाणी मिळणार असले तरी यावर मनपातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्य मूग गिळून बसले आहेत.